बुधवार, २० मार्च, २०१३

इंस्पेक्टर सचिन सूर्यवंशी निमित्ताने

  

चाटतात सदा पाय
धावतात पैश्यामागे
तयाचे हे भूत तुवा 
सूर्यवंशी आज लागे

मारणारे गुंड होते
त्यात नवीन काय ते
अरे पण तुम्ही तया
सदा मिरविले होते

आठवता धर्म आज
जरी केलेत चांगले
आजवरी भुजंगास
त्या दुध होते पाजले

घमेंडी नृपा नावडे
सरदार बाणेदार
शिरताच सत्ता शिरी
करे प्यादेही बेजार

भीम व्हा युधिष्ठीराचे
हात तुम्ही जाळणारे
रक्त दु;शासनी उष्ण
घटघटा प्राशणारे

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

सोमवार, १८ मार्च, २०१३

जे.कृष्णमूर्तीच्या पुस्तकात

जे.कृष्णमूर्तीच्या पुस्तकात
एकदा मला पाडगावकरांची
कविता सापडली .
तेव्हा पासून मी
पाडगावकरांची कविताच
वाचू लागलो .
वाचता वाचता एक दिवस
तिथे मला पुन्हा
जे.कृष्णमुर्ती भेटले
आणि म्हणाले
“ कळले का मी म्हटले होते ते, 
लिहलेली कविताच
फक्त कविता नसते!

मग मी पाडगावकरही  
ठेवून दिले.
कारण,मला आता 
शब्दात नसलेली कविता
कळू लागली होती .

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

विमला ठकार



 
ज्ञानेशाच्या अंगणातून
विश्वाच्या प्रांगणात
पसरलेली विद्युलता
तेजस्वी स्वयंप्रकाशी
देह मनाच्या बंधनातून
देश काळाच्या शृंखलेतून
धर्म जातीच्या जोखडातून
मुक्त झालेली मनस्विनी
साऱ्या मानव जातीसाठी
तीच आकांक्षा बाळगणारी
मातृहृदयी करुणामयी मुक्ताई
ती करुणा आणि मैत्री
शब्दाशब्दातून प्रगट होणारी
धगधगीत अग्निशिखेची
ज्ञानयज्ञाची जणू मूर्ती

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

विमालाजी गेल्यावर





खरच सांगतो,
विमालाजी गेल्यावर
मी इतका रडलो की
आई गेली तेव्हाच
तसा रडलो होतो .
विमलाजीवर आपण
किती प्रेम करतो
हे हि तेव्हाच कळले
खरतर ,

विमलाजींचा संबंध
म्हणजे ,
त्यांच्या पुस्तकांचा
अन तीन पत्रांचा

पण...
माझ्या आयुष्यावर
सर्वाधिक प्रभाव पाडणार
व्यक्तिमत्व केवळ त्यांचेच.

असे म्हणतात
आईवडिलांकडून आपल्याला
काही गोष्टी मिळतात
आनुवांशिक ,

तसे माझे हे मन
मला विमालाजींकडून
मिळाले आहे.
जरी अजून ते
मौनात नाही गेले,
ध्यानात नाही रंगले,
पण माझे त्यांचे नाते
मी पक्के जाणले आहे.

 विक्रांत प्रभाकर

http://kavitesathikavita.blogspot.in/

रविवार, १७ मार्च, २०१३

ध्यान (ओशोची पत्र कविता अनुवाद )






ध्यानातून काहीही मिळवायची
आकांक्षा
सर्व प्रथम मनातून काढून टाका  .
अगदी सहज पणे ध्यान करा .
जे घडायचे ते घडू द्या  .
एक दिवस अगदी सहज
सारे काही घडू लागेल.
प्रयत्नांनी ध्यान कधीच होत नाही .
खरतर ,
प्रयत्न हाच अडथळा असतो
प्रयत्नात आणि अभ्यासात
एक प्रकारचा तणाव असतो
एक प्रकारची अपेक्षा असते
अगदी शांतीची अपेक्षा सुद्धा
अशांती निर्माण करते
हा तणाव जायला हवा.
ज्या क्षणी हे पटते
दैवी शक्तीचे अवतरण होते.
मी हे करतो
हे वाटणेच थांबवा.
त्या ऐवजी अनुभूत करा.
मी मला, स्वत:ला
त्याच्या हवाली करत आहे.
हेच समर्पण आहे.
स्वत:चे संपूर्ण समर्पण करा.
जेव्हा हे कराल तेव्हाच
अगाध रिक्त्ततेच प्रवेश होईल.
शरीर आणि श्वास शांत होईल.
तुम्ही म्हणाल ,
हे तर मनाने सुद्धा घडते!
पण जेव्हा मन जाते,
तेव्हा जे घडते,
ते अवर्णनीय असते.  
अनुवाद--विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

गणिका



जीवन म्हणजे काय हे
कळायच्या आत
त्या येवून पडतात
देह्भोगाच्या नरकात
पर्जन्य काळचे सुंदर
खळखळते निर्झर
येवून पडावेत
गलिच्छ गटारात
तश्या त्या बालिका
होतात गणिका
बालपण न पुसता
काचा कवड्या
खेळता खेळता

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

शुक्रवार, १५ मार्च, २०१३

भिजलेल्या फांदीवर





भिजलेल्या फांदीवर
पक्षी एकटा भिजत
भिजलेल्या सुरामध्ये
होता उगाच झुरत

तेच एक गाणे त्याचे
किती किती ऐकायचे
मान्य प्रेम भंगलय
किती किती रडायचे  

माझे हे बोल त्याला
मुळीच पटले नाही
दु:ख जडले प्रेम ते   
कधी कमी झाले नाही

खिडकी बंद केली मी
गडद पडदे खाली
तरीही त्याची विराणी
घुसतच आत आली

ओल्या गर्द अंधारी त्या
पिंजून पिंजून गेलो
विरघळुनी सुरात    
मग पक्षी तोच झालो  

 विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

अटळ

अटळ **** गिरनारी मूर्ती फुटली गोरक्षाची  ती कृती भ्याड नामर्द रात्रीची  अफगाणी मूर्ती फुटली गौतमाची  ती कृती उद्दाम  द्वाड दिवसा...