मंगळवार, २४ मे, २०२२

आठवण

 आठवण
*******

फार काही फार काही आता उरलेले नाही 
राहू देत मजसवे तुझ्या आठवणी काही १

मागायला हात नाही बोलायला शब्द नाही
येते तुझी आठवण बघ थांबतच नाही २

भेटलीस कधीकाळी किती ऋण जीवनाचे
पुनवेचा देह झाला मन शुभ्र चांदण्याचे ३

ओघळून नभ आले चिंब चिंब रान झाले 
जपलेले स्वप्न उरी सत्य खरोखर झाले ४

जरी केला वायदा मी पुढील त्या जन्मातला
वृथा जरी समजुत शब्द होता मनातला ५

वाहतीच जिंदगानी सवे कुणा वाचूनही 
खळखळ होते तरी स्थिरावता प्रवाह ही  ६

सुख थोडे दुःख थोडे काळजात भरलेले 
जीवनाचे रंग बहु दत्त राये दाखवले  ७

मिटताच मन रात्री जग जरी मिटू जाते 
स्वप्न अन सुषुप्तिही स्मरणाचे गाणे होते ८

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘




अमृताचा थेब

अमृताचा थेंब
***********
अमृताचे थेंब 
अमृताच्या डोही 
ऐसी झाली काही 
गोष्ट इथे ॥१

अमृताच्या घरी 
अमृत पाहुणा
गुण आले गुणा 
सोयरीका ॥२

ज्ञानराज शब्दी
ज्ञानाचा पाझर 
दाटला सागर 
थेंबोथेंबी॥३

देवे आळंदीत 
सांगितले मज 
तेच शब्द आज 
पुन्हा कानी ॥५

विक्रांत कृपेची 
जाहला ओंजळ 
सुखची केवळ 
अंतर्बाह्य ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

सोमवार, २३ मे, २०२२

मुळावर

मुळावर
*******
कळेना कोण असे
कुणाच्या मुळावर ?
ज्याचा त्याचा डोळा 
फुकटच्या फळावर  !

कोण ती छापती
सर्टिफिकेट खोटी 
आणिक वाटती
भीतीविन जगाती १

कोणास पाकीटे 
किती ते आवडते 
मरू दे जगा म्हणती
माझे काय अडते २

कोण भय दावून 
माल तो ढापतो 
आरटीआय शस्त्र 
सदा कदा उगारतो ३

पाोटासाठी पाप 
करावे ते म्हणती 
नरकाच्या दारात 
स्व पदेची जाती ४

अश्या या जगाला 
 विक्रांत विटला
पापी डोळा वाहून  
दत्ता रे थकला  ५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

रविवार, २२ मे, २०२२

ज्ञानराया

ज्ञानराया
*******

देह हा विकला 
तुज ज्ञानराया 
आणि कुण्या पाया 
पडू आता ॥
जिथे जातो तिथे 
देवा तुझे पाय 
कानी गुरुराय 
मंत्र तुझा ॥
राम कृष्ण हरी 
हात खांद्यावरी 
चालविसी तरी 
कळेचिना ॥
संत मुखातून 
कानी तुझी वाणी 
येतसे सजूनी 
सारभूत ॥
किती करिसी तू 
माझ्यासाठी कष्ट 
लीन हा विक्रांत 
पायी तुझ्या ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

शनिवार, २१ मे, २०२२

ज्ञानराज माणीक प्रभू गीता ज्ञान यज्ञातीलअ.१६ श्लोक ८ते ११विवेचना मधील काही मुद्दे.

ज्ञानराज माणीक प्रभू गीता ज्ञान यज्ञातीलअ.१६ श्लोक ८ते ११विवेचना मधील काही मुद्दे
********::::********:::::*****:::
आजही श्री जनी काल झालेल्या आणि अगोदरच्या श्लोकांचा आढावा घेतला आणि त्याला धरून आजच्या निरुपणाचे सूत्र पुढे चालू ठेवले
 
आज  त्यांनी  श्लोक 8 पासून ते श्लोक 11 पर्यंत निरूपण केले . निरुपना अगोदरच त्यांनी सांगितले की वेळ कमी आहे. त्यामुळे ज्या श्लोकांमध्ये पुनरावृत्ती होते ज्याचे निरूपण अगोदरच झालेले आहे त्याच्यावर ते भर न देता ते थोडक्यात सांग सांगतील व ज्यावर डिस्कशन चर्चा झाली नाही ते विशद करून सांगतील

श्लोका विशद केलेला असुरी गुण म्हणजे असत्य. हे असुरी लोक  असत्यात वास्तव करून असतात मूर्तिमंत असत्याचे रूप असतात हे सर्व जग हे असे सत्य मानत असतात अगदी देव-धर्म अगदी देव वेद आणि समोर प्रत्यक्ष दिसणार शिवलिंगही.

त्यानंतर हे असुरी गुणयुक्त लोक हे सर्व जग कुठलाही आधार नसलेले, ईश्वर नसलेले आहे असे म्हणतात
परंतु खरे पाहू जाता या जगाचा जीवनाचा आधार बेस किंवा फाउंडेशन हे धर्म आहे.
 धर्म म्हणजे जणू काही फुलांच्या माळेला धरून ठेवणारा धागा आहे धर्माच्या मर्यादा असल्यामुळे चक सुरळीत चाललेले आहे आपण आपल्या नात्यांमध्ये पहिली पत्नी आई बहीण यांच्याशी वेगवेगळ्या पद्धतीने वागतो कारण ते आपल्याला धर्माने घालून दिलेले नियम आहेत व जे आपल्या आत  रुजलेले आहेत त्यावरील विश्वास हा धर्माचाच भाग आहे.  किंबहुना धर्म हे एक प्रकारचे कॉमन सिविल कोडे आहे असे म्हटले तरी चालेल धर्म धर्माचे नियम हे का प्रत्यक्ष नसतात म्हणजे ते दिसत नाही असे सांगतात.  धर्म म्हणजे हिंदू मुसलमान शीख जैन या सार्‍या उपासना पद्धती आहेत .आपल्याला मोक्षापर्यंत जाण्यासाठी करण्याची उपासना आवश्यक आहे पण,  जे एकमेकांच्या नात्यांमध्ये व्यवहारांमध्ये माणुसकी मध्ये असलेले जीवनाचे नियम हे धर्म आहेत हिंदू मुसलमान ख्रिश्चन सारेजण आपल्या आईशी त्याच आदराने प्रेमाने वागतात आपल्या मुला मुलीशी वात्सल्य़युक्त प्रेम करतात. हाच धर्म.
आसुरी लोक देवही मानत नाहीत जगात ईश्वर कुठे आहे असे ते म्हणतात .व्हेअर इज गॉड ? त्याचे उत्तर देताना स्वामीजी म्हणतात स्वामीजी म्हणतात व्हेर इज गॉड हा प्रश्न चुकीचा आहे प्रश्न व्हॉट इज द गॉड असा पाहिजे. होतापरमेश्वर आहे किंवा नाही हा वाद तर जगाच्या अंतापर्यंत चालू राहील पण जर ज्याला खरोखरच  संपायचा हवा  त्यांनी बसून अगोदर परमेश्वराची व्याख्या करणे आवश्यक आहे, ती झाल्याशिवाय ती चर्चा करता येणे शक्य नाही. परंतु देव न मानणारा ती व्याख्या देऊ शकत नाही कारण तो देव मानतच नाही म्हणून देव मानणाऱ्या ची व्याख्या त्यांनी स्विकारावी असे प्रतिपादन सीजी करतात. ती व्याख्या स्वीकारून तो प्राप्त करण्याचे नियम पद्धती अत्मसात करून पहावी आणि जर त्यास देव सापडला नाही भेटला नाही तर मग पुढे वाद चालू राहायला हरकत नाही ,किंबहुना तो वाद चालणारच नाही असे ते म्हणतात.
 देवाची हि व्याख्या वेदांमध्ये उपनिषदांमध्ये केलेली आहे उपनिषदांमध्ये स्पर्श रस रंग रूप गंध याचा अनुभव ज्याच्यामुळे येतो किंवा जो हे जाणतो तोच परमेश्वर आहे असे म्हटले आहे .मृतदेहाला हे डोळे असतात कान असतात नाक असतात परंतु ते हा कुठला अनुभव घेऊ शकत नाही म्हणूनच त्याच्या पाठीमागे असलेली शक्ती ती जो डोळ्याचा डोळा, कानाचा हे कान असे म्हटले जाते तोच परमेश्वर आहे. त्याशिवाय दुसरे उदाहरण देतात ते म्हणजे मोबाईल मध्ये असलेल्या बॅटरीच. या मोबाईल मध्ये हजारो फंक्शन असतात परंतु  जर बॅटरी नसेल तर ती एक निरूपयोगी वस्तू होऊन जाते. तसेच देहामध्ये परमेश्वराचे अस्तित्व असते .
पण हे आसुरी लोक असे म्हणतात की आपल्या सगळ्यांचा जन्म हा केवळ परस्पर संबंध ठेवल्यामुळे झालेला आहे. त्याला अन्य काही कारण नाही.जग हे कामने पासूनच निर्माण झालेले आहे .इथे श्रीजी पाणी तयार होण्याची रासायनिक प्रक्रिया समोर ठेवतात, पाणी होण्यासाठी दोन हायड्रोजन व एक ऑक्सिजन यांचे अणू लागतात परंतु एका टेस्ट ट्यूब मध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन टाकला असता पाणी तयार होत नाही ते पाणी तयार व्हायला आणखीन एक वस्तू लागते तिला कॅटलिस्ट असे म्हणतात. कॅटलिस्ट एक सूक्ष्म प्रकारची इलेक्ट्रिसिटी असे म्हणूयात. म्हणजेच ती कुठून येते तर परमेश्वरा तून.
पुढच्या श्लोकात भगवान त्यांच्यावर ती टीका करतात ते म्हणतात की अशाप्रकारे खोट्या दृष्टीचा अवलंब करून हे लोक स्वतःचा नाश करून घेत असतात आणि उग्र कर्म करायलाच जणू काही ते जमलेले असतात त्यांची सर्व कामे ही अहितकर आणि जगाचा नाश करण्यासाठी होतात तेव्हा त्यासाठी त्यांचा जन्म आहे की काय असे वाटते
पुढच्या श्लोकात खोट्या दृष्टीचा अवलंब करून स्वतःचा नाश करणे म्हणजेच अल्प बुद्धी पणा आहेआसे सांगतात

१०ओव्या श्लोकात ते असे म्हणतात की दम मद इत्यादीनी युक्त घेऊन कधीही पूर्ण न होणाऱ्या कामनाचा  आश्रय घेऊन हे राहतात .
कामना या कधीच कुणाच्याही पूर्ण झालेल्या नाहीत. कामनांना अंत नाही आणि कामना म्हणजेच दुःख आहे असे श्रीजी म्हणतात. कारण कामनांची वाढ ही जीवोमेट्रिक पद्धतीने होत असते तर कामांची मूर्तीही मॅथेमॅटिक गतीने होत असते. कामना आणि दुःख यांचा एक रेशो असतो .कामना आणि कामनापुर्ती त्यांची तुलना केल्यावर ती जो येतो तो रेशो. तो पाहता कळते का मनातून केवळ दुःख जन्मते.जेवढ्या जास्त कामना एवढे दुःख जास्त ,कारण कामना मधून अपेक्षा वाढत असतात अपेक्षा जसजसे वाढत जाते तसतसे सुखही कमी होत असते ,यांचे प्रकार अशी असतात.  कामना पुर्तीत आनंद नाही तर त्याचे शमन करण्यातच आनंद आहे. कामना जन्माला आली की मन प्रक्षुब्ध होते ते कामना पूर्ण करण्यासाठी ते धडपडते स्वतःला त्रास करुन घेते.  ती मिळताच शांत काय होते. नीट पाहता कळते इंद्रिय शांत होत नाही मन शांत होते. त्यामुळे आपल्याला आनंद मिळतो इंद्रियाच्या तृप्तीने आनंद मिळत नाही मनाचे शमन झाल्याने.शमन करण्यासाठी घेतले जाणारे औषध आहे ते म्हणजे भक्ति ,आपण जी उपभोगतो खातो पितो वस्त्रप्रावरणे पांघरतो किंवा इतर उपयोगी आणि चैनीच्या वस्तू वापरतो या देवाला अर्पन करून वापराव्यात .तसेच दुसरा मार्ग म्हणजे आपल्या कामनाचे dilution करणे म्हणजे दुधात पाणी घालून तेपातळ केले जाते.जसे की आपल्या इच्छा सगळ्यांच्या सोबत शेअर करणे उदाहरणार्थ  त्यांनी सांगितले की एखाद्यास पाणीपुरी खायची फार इच्छा झाली पाणीपुरी तो सगळ्यांच्या सोबत घेऊन वाटून आपण ही खातो. त्याचप्रमाणे कामना या पुढे ढकलत राहिलं पोस्टपोन करत राहिलं तरी सुद्धा त्याचे शमन होऊ शकते याशिवाय या कामना  काम्यवस्तूच्या निर्मात्याचे चिंतन केले असता गळून जाते .या ठिकाणी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे उदाहरण दिले आहे कल्याणच्या सुभेदाराची सून पाहून छत्रपती म्हणतात की आमची आई अशीच   सुंदर असती  असती तर आम्ही असेच सुंदर झालो असतो .यामध्ये कामना हि मातृ स्मृतीमध्ये उच्च भावनेमुळे निर्माणच झालेली नाहीये (अर्थात महाराजांचीही दृष्टीच अलौकिक होती ते श्रीमान योगी होते ) ही वृत्ती तशीच आपल्यामध्ये बाळगली असता आपण त्या कामाना पासून दूर जाऊ शकतो .
मोहात आसक्त झाल्यामुळे ही लोक देहाच आत्मा समजतात किंवा आपण फक्त देहच आहोत असे समजतात अशा प्रकारच्या भ्रमा मुळे ते नेहमी अशुचीत्वा कडे प्रवाहित होतात.
११ हे असे लोक प्रलयाच्या अंतापर्यंत असंख्य चिंता मनात धरून  उपभोगालाच आपले परम ध्येय माननात त आणि हाच काय तो पुरुषार्थ आहे असा निश्चय त्यांनी केलेला असतो.
सुखासाठी दुसऱ्यावर अवलंबणे ही वृत्तीच आसुरी आहे .परवश प्रकृती आहे सर्व  परवशअहे ते दुःखद सर्व आत्मवश सुख असे शास्त्रात म्हटलेले आहे .त्याचे उदाहरण देताना त्यांनी सांगितले की तुम्हाला जर हॉलमध्येच जबरदस्तीने बसून ठेवून प्रवचन ऐकवली किंवा काही दिले तरी तुम्ही दुःखात राहत तेच तुम्हाला कधी यायला आणि जायला मोकळीक असेल तर तुम्ही सुखात असाल .त्याचप्रमाणे तुमचे पैसे चेकबुक क्रेडिट कार्ड तुमच्या ताब्यात असेल तर तुम्ही स्वस्थ चित्ताने आनंदात असतात. पण दुसऱ्याच्या ताब्यात असेल तर तुम्ही दु: खात असाल. हे व्यवहारिक साधे उदाहरण आहे।
पुढे ते चिता चिंता या दोन शब्दांमधील फरक विशद करतात एका अनुस्वार यामुळे खूप फरक पडतो चिता आहे फक्त मृत माणसाला जाळते तर चिंता जिवंत माणसाला. या जाळत्या चिंते बद्दल ते म्हणतात ही चिंता कधीही कुठेही कर कशी येते आणि मन व्यापून आपल्याला दु:खी करते.
हि चिंता जर संसारी माणसाला वाटत असेल तर मग ते त्याने चिंतेचे मॅनेजमेंट करण्याचा सल्ला देतात चिंतेचा विषय घेऊन एक तासभर बसावे तिचा उपाय करावा तिचे त्यातून मार्ग काढण्याचे प्रकार ठरवावेत उपाय ठरवावेत आणि ते कधी पासून अंमलात आणायचे हे ठरवावे आणि आपल्या चित्तातून ती चिंता बाजुला काढून ठेवावी. दुसरा उपाय म्हणजे परमेश्वराला पूर्ण शरणागती मी परमेश्वरच आहे म्हटल्यावर ती कसली चिंता.जसे मूल आईला संपूर्णतः समर्पित असत. ते मूल कसलीच काळजी करत नाही त्याच्या काळजी आई करते.त्याप्रमाणे परमेश्वर आपला सांभाळ करतो योगक्षेमं वहाम्यहम्!!

ज्ञानराज माणीक प्रभू गिता ज्ञान यज्ञातीलअ.१६ श्लोक ६ अणि ७ विवेचना मधील काही मुद्दे.


श्री ज्ञानराज माणीक प्रभू गीता ज्ञान यज्ञातीलअ.१६ श्लोक 6अणि 7 विवेचना मधील काही मुद्दे.
*********


श्रीजी सांगतात की भगवंतांनी पहिल्या तीन श्लोकात दैवी गुणांचे वर्णन संपूर्णतः केले आहे विस्ताराने केली आहे पुढील चौथ्या श्लोकांमध्ये मुख्य आसुरी गुण सांगून झाल्यावर  पाचव्या श्लोकात ते फलश्रुती सांगतात आणि या अध्याय  एका अर्थी इथे समाप्त होतो. परंतु त्यानंतर भगवान आसुरी गुण अधिक विश्लेषण करून सांगत आहेत

शौच या गुणाचे विश्लेषण करताना श्रीजी सांगतात की शौचाचा अर्थ स्वच्छता आणि पवित्रता असा आहे. वर सांगितल्याप्रमाणे आपल्या वाणी मध्ये बोलण्यामध्ये आचरणांमधे स्वच्छता हवी शुद्धता हवी 
श्री जी  एक उदाहरण देतात ते म्हणजे आपण बुट घालून घरी जेवतो का ?त्याचे उत्तर नाही असेच असते . परंतु हॉटेलमध्ये समारंभात बराच वेळा आपण बुट घालून जेवतो. खरंतर हे अयोग्य आहे कारण जेवण करणे हे एक यज्ञकर्म आहे. या यज्ञ कर्मामध्ये आपल्या पोटामधील अग्नी हे भगवंताचे स्वरूप आहे, त्याच्यामध्ये आपण अन्न टाकत असतो . 
जेवत कोण असते शरीर किंवा दुसरा आतमधला कुणी?  जर शरीर जेवत असेल असे म्हटले तर मेलेल्या माणसाला खडीसाखर खायला काहीच हरकत नाही. पण तो खडी साखर खाऊ शकत नाही . जेऊ शकत नाही
म्हणजेच शरीरामध्ये जेवणारा दुसरा कोणीतरी असतो सिद्ध होते .
तसेच शुद्ध आचरण म्हणजे काय तर जे धर्मग्राही आहेत ते . जे सारे धर्माने सांगितलेले आचरण. मंदिरात जाणे, तिलक, कुंकू लावणे ,दानधर्म करणे, कुलाचार पाळणे ही सर्व आचरण ही शुद्धी करणारी असतात ती टाळणे लपवणे योग्य नाही .

तर अश्या प्रकारे  असुरी गुणाचे लोक हे प्रवृत्ती आणि निवृत्ती या दोन्ही गोष्टींना जाणत नाही त्यांच्या ठिकाणी शुचि नसते सदाचार नसतो आणि सत्य नसते . 
या लोकांना काय करावे आणि काय सोडावे हेही कळत नाही 
नीट पाहू गेले तर धर्म आणि मोक्ष ही प्रवृत्ती मध्ये मोडतात तर अर्थ आणि काम ही निवृत्ती मध्ये मोडतात याचे भान आले की आचरण योग्य होऊ लागते आणि हे पुरुषार्थ पालन केले जाते.
सत्य हे धर्माचे रक्षण करते याचे भान आसुरी गुणाच्या लोकांना नसते.

शुक्रवार, २० मे, २०२२

श्लोक १६.४ व १६.५ .श्री ज्ञानराज माणिक प्रभुजी महातराज गीता यज्ञ आधारीत.

श्लोक १६.४ व १६.५  .श्री ज्ञानराज माणिक प्रभुजी महातराज  गीता यज्ञ आधारीत.
*****************::
दैवी गुणांचे वर्णन केल्यानंतर आज श्री जी असुरी गुणा बद्दल सांगत आहेत .

आसुरी गुणांमधील पहिला गुण म्हणजे दंभ हा आहे 
दंभ म्हणजे आपण जे नाही ते दाखवणे आपल्यात नसलेल्या गुणाचे खोटे प्रदर्शन करणे किंवा ते आपल्याच आहे असे भासवणे . उदा. भित्र्या माणसाने आपण फार शूर आहोत असा आव आणणे.

दर्प म्हणजे ,मी फार कुठेतरी मोठा आहे असे भासवणे किंवा असे स्वतःलाच वाटणे .आपल्या जवळ असलेल्या प्रत्येक गोष्टीचा गर्व वाटणे .उदा घर गाडी बंगला धन  इत्यादी. ममत्व हा दर्पाचा स्थायी भाव आहे 

अभिमान म्हणजे जे आपल्या मध्ये जे आहे ते मिरवणे त्याबद्दल अहंकार बाळगणे .  उदा .रूप  कला गुण जसे की गायन नृत्य वकृत्व इत्यादी.
हे सारे गुण देवाने दिलेले असतात .ते त्याचेच दैवी गुण असतात .ते आपले म्हणणे हे देवाला कसे अवडेल .अहंता दर्पाचा स्थायी भाव आहे .

अश्या रितीने जिथे अहंता ममता तिथे आसुरी गुण .

पारूष्य म्हणजे ताठा , कठोरता .
ताठा (अकड) असलेल्या व्यक्तीची तुलना श्री जी नी मेलेल्या व्यक्तीशी केली आहे .मरून पडलेल्या मुडद्याशी केली आहे .देह मेल्यावर ताठ होऊन जातो त्याप्रमाणे या ताठ माणसाची अवस्था असते 
अज्ञानाबद्दल ते सांगतात ,ज्ञान हे सापेक्ष असते कधीकधी वर पाहता जे ज्ञान असते तेच अज्ञान असते .जसे की अणू बॉम्बचा शोध लावलेले शास्त्रज्ञ ज्ञानी वाटतात परंतु ते ज्ञान माणसाच्या विनाशाला कारणीभूत होते ते अज्ञानच होय. कोरोना व्हायरसचा जंतू निर्मान करणारे ज्ञान हे अज्ञान तर कोरोनाव्हायरस ची लस शोधून काढणारे ज्ञान हे खरोखर ज्ञान होईल .

क्रोध म्हणजे रागावणे ,चिडणे. श्री जी इथे पुन्हा वर अक्रोध मध्ये उल्लेख केलेले क्रोधाचे वैशिष्ट सांगतात जसे की क्रोधा विनाकारण नसतो त्याला कारण लागतं .कामना फलद्रुप न होणे हे ते कारण असते तसेच क्रोध हा सर्व नाशाचे कारण आहे असेही ते .सांगतात .ते सांगतात रामायण का घडलं तर कैकयीच्या क्रोधामुळे कळलं तसेच रावणाच्या क्रोधामुळे घडले .
महाभारत का घडलं द्रौपदीच्या क्रोधामुळे घडलं दुर्योधनाच्या क्रोधामुळे घडलं तसेच भगवंताच्या क्रोधामुळे घडलं .

हि सारी दैवी संपति कशाला गोळा करायची आहे तर मोक्षा साठी.मोक्ष कुणाला हवा असतो . तर याच दैवीगुण युक्ताला .
सारे काहि असुनही या जन्ममृत्युच्या चक्रातून बाहेर पडायची इच्छा असते पुढचा जन्म कुठला असेल ते आपल्याला माहित नसते पुढच्या जन्मात कुठल्या दुःखातून जावे लागेल त्याची ही खात्री नसते शाश्वत सुखासाठी  आनंदासाठी प्रत्येकाला मोक्ष हवा असतो .
तर आसुरी शक्ती ही सदैव बंध निर्माण करते

 त्यामुळे भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतात की हे अर्जुना तू शोक करू नको कारण तू दैवी संपत्ती घेऊन जन्माला आलेला आहेस .
ज्याअर्थी अर्जुनच्या मनामध्ये करुणा  निर्माण झाली त्याअर्थी अर्जुना मध्ये दैवी गुण संपत्ती आहेच. परंतु समोर असलेल्या व्यक्ती ही आपली माणस आहेत आपली भाऊ काका मामा असे आहेत हे आपले पण ज्या क्षणी जन्मालआले तो मिश्र गुणी झाल. त्याच्यात असुरीगुण प्रादुर्भाव झाला त्यामुळे भगवंताला त्या गुणाला दूर करण्यासाठी ही गीता सांगावी लागली. पण मुळात तो दैवी पुन्हा युक्त होत।

आधारीत .
श्री ज्ञानराज माणिक प्रभुजी गीता यज्ञ



आधार

आधार ****** देव का रे कोपतो हा रागावून कुणावरी  देव का रे धावतो हा आपल्या त्या कुणासाठी  देव का रे राखतो हा  दुजा भाव मुलांसाठी ...