बुधवार, ८ सप्टेंबर, २०२१

वेळूचे स्वर


तू नाहीस  
तुझ्या कविताही नाहीत 
ॠतु गेला 
साहजिकच
भ्रमरही निघून गेले 
वेडया वेळूला
आजन्म शापागत
पडलेली छिद्र
त्यातून वाहतो 
कधीतरी चुकार वारा 
अन उमटतात स्वर 
जे जागवतात 
काही वेड्या आठवणी 
पण त्यांच्या कविता 
नाही होत .

तो असतो
नुसताच नाद 
नुसताच हुंकार
जो थांबवतो श्वास 
अन
अपुर्णतेचा विवशतेचा
पराधिनतेचा  निश्वास उमटवून 
हरवतो शुन्यात .

न मागता न बोलावता 
तू आली होतीस 
न सांगता न थांबता 
निघून गेलीस  
तश्याच तुझ्या कविताही 
आता मी त्यांना 
साद घालत नाही 
बोलावत नाही
पण ते वेळूचे स्वर
त्यांनाही थोपवत नाही

*******


ती आपली
एक गोष्ट होती
अन प्रत्येक गोष्टीला 
एक शेवट असतो 
नाहीतर ती गोष्ट 
गोष्ट कशी राहील .
ती रुजते वाढते 
फुलते अन अंती संपते 

पण सरलेली गोष्ट 
मनात घर करून राहते 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सुटू द्यावे

सुटू द्यावे ******* असते सदैव साथ का कुणाची  सुटतात हात सुटू द्यावे ॥ खेळ जीवनाचा पहायचा किती  मिटतात डोळे मिटू द्यावे ॥ हातात न...