गुरुवार, २९ जून, २०१७

सगळ्यांनाच नाही जमत




ती तुझी चौकट
सुरक्षितेची
प्रतिष्ठ्तेची
तेवढीच महत्वाची आहे
ती तुझी गरज
समर्पणाची
उडण्याची
तेवढीच आवश्यक आहे
आणि दोन्ही येतात
समोरासमोर
छेडतात एकमेकां
तेव्हा येणारे द्वंद्व
तेही अनिवार्य आहे
यातून निघणारा
सुटकेचा
धोपट मार्ग
तोही निश्चित आहे
कारण शेवटी
समाजबंधन  
व प्रतिष्ठा
हीच प्राथमिकता आहे
असू देत
सगळ्यांनाच नाही जमत 
चालतांना
भर रस्त्यात
बकुळीची फुले वेचणे

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नर्मदेच्या काठावर

नर्मदेच्या तीरावर  ************ रस्त्याच्या घड्याळावर पायाचे काटे चालतात अंतर हीच वेळ असते असा प्रवास चाले सतत  कधी भेटतो तीर सु...