शुक्रवार, ९ ऑक्टोबर, २०१५

जाणाऱ्यास ...





प्रवासाच्या शेवटी शेवटी
कुणा लागू नये कधी ठेच
जमा केलेल्या सौख्याचा
असा होऊ नये कधी वेच 

उन वारा पाऊस खातांना
निवाऱ्यास रात्र काढतांना
थकते शरीर कण्हते मन
नि चालू पडते उजाडतांना

त्या दुःखाचा अंत होतो
मुक्काम येवून ठेपतांना
शीणभाग अवघा हरवतो
पडाव असा ओलांडताना

का नकळे ही माणसे अशी
उगाच वैर जागते ठेवतात   
देणे घेणे संपणार असते  
तरी जीव जाळत बसतात   

जाणाऱ्यास त्या जावू द्यावे
चूक भूल अन पदरी घ्यावे
आज चालला तो ज्या वाटे
उद्या आपली ध्यानी ठेवावे

तो गेल्यावर स्मृती कसली
आली गेली किती टिकली
जणू धुक्यांनी रेखाटलेली 
आरश्यावरील चित्र इवली

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

तुझ्यासाठी

तुझ्यासाठी ********* मनावरी गोंदलेले नाव तुझे हळुवार सांग तुला दावू कशी प्रेम खूण अलवार ॥१ डोळ्यातील चांदण्यांना तुझ्या ...