सोमवार, १७ मार्च, २०१४

रागावता श्रीमतीजी

रागावता श्रीमतीजी
आपण चूप राहावं
मिळतंय जेवण ते
गप गुमान गिळावं
 
ती का रागावली याचं
कारण लहान आहे
इथं साऱ्या संसारांचं
एकच गाऱ्हाणं आहे

दर सहा महिन्यात
एक भूकंप होतोय
जपान्यांचे ते सोसणं
आता मला कळतय

तसे लहान उद्रेक
नेहमीच घडतात
दोन चार दिवसात
अन मिटून जातात

हळू हळू दरी पण
रुंद खोल करतात
जोडणाऱ्या त्या पुलास 
रे सावध म्हणतात

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

अशोक कोकणे श्रद्धांजली

अशोक कोकणे श्रद्धांजली  *********** महाड मधील आमचे घरमालक कोकणे, भाई अन् ताई यांना असलेली पाच मुले, विजय दिलीप अशोक प्रदीप आणि र...