सोमवार, १७ मार्च, २०१४

रागावता श्रीमतीजी

रागावता श्रीमतीजी
आपण चूप राहावं
मिळतंय जेवण ते
गप गुमान गिळावं
 
ती का रागावली याचं
कारण लहान आहे
इथं साऱ्या संसारांचं
एकच गाऱ्हाणं आहे

दर सहा महिन्यात
एक भूकंप होतोय
जपान्यांचे ते सोसणं
आता मला कळतय

तसे लहान उद्रेक
नेहमीच घडतात
दोन चार दिवसात
अन मिटून जातात

हळू हळू दरी पण
रुंद खोल करतात
जोडणाऱ्या त्या पुलास 
रे सावध म्हणतात

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वरदान

वरदान ****** उगा उगाच पथात पाऊस पडुन गेला  थकल्या जीवा तजेला क्षणात देऊन गेला    मागेपुढे होता दग्ध रखरखाट सारा  व्याकुळले प्राण...