गुरुवार, १० जानेवारी, २०१३

लिहायचे कुणासाठी




लिहायचे कुणासाठी

लिहायचे कश्यासाठी

शेवाळल्या तळ्याकाठी

जड जड झाली दिठी

सुकलेल्या पानावरी

उदासली सांज सारी

मनातली अक्षरे ही

मनाआड गेली सारी

वेदनांत मरतांना

वेदनांचे गाणे झाले

ऐकतांना दूर कुठे

कुणा डोळी पाणी आले



विक्रांत प्रभाकर

http://kavitesathikavita.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

अशोक कोकणे श्रद्धांजली

अशोक कोकणे श्रद्धांजली  *********** महाड मधील आमचे घरमालक कोकणे, भाई अन् ताई यांना असलेली पाच मुले, विजय दिलीप अशोक प्रदीप आणि र...