गुरुवार, १० जानेवारी, २०१३

लिहायचे कुणासाठी




लिहायचे कुणासाठी

लिहायचे कश्यासाठी

शेवाळल्या तळ्याकाठी

जड जड झाली दिठी

सुकलेल्या पानावरी

उदासली सांज सारी

मनातली अक्षरे ही

मनाआड गेली सारी

वेदनांत मरतांना

वेदनांचे गाणे झाले

ऐकतांना दूर कुठे

कुणा डोळी पाणी आले



विक्रांत प्रभाकर

http://kavitesathikavita.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...