बुधवार, ६ मे, २०१५

शूल घुसे काळजात






अश्या विझल्या डोळ्यांनी  
थंड थिजल्या शब्दात
नको नको बोलू सखी
शूल घुसे काळजात

मिटले हे हसू तुझे
सांग कुणाच्या बोलांनी
का तुला खुपले माझे
जाणे शब्द उधळूनी

नाही कसे म्हणू तुला
जीव जडे तुजवर
पतंगा हाती नसते
झेपावणे दिव्यावर

कसे समजावू तुज
दावू भाव उघडून
सर्वस्व तुला वाहून
गेलो भणंग होवून

मरू मरू जातोय मी  
प्रेम तुझे संजीवनी
रागावता तुच अशी
उरणार ना कहाणी

विक्रांत प्रभाकर


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

एवढेच पुरे

एवढेच पुरे  ******** वेदनांची स्मृती म्हणजे असते भय  आनंदाचे स्मृती म्हणजे असते आकांक्षा  आणि ही दिसणारी अस्वस्थता  भय आणि इच्छे...