बुधवार, २७ मे, २०१५

कोंबडी ..





मरणाऱ्या कोंबडीचा आक्रोश
कधीच रश्यात उतरत नाही
अन तिची शेवटची तडफड
तवंग जराही हलवत नाही  

वजनावर आडवी ठेवे कसाई  
कधीच जीव म्हणून बघत नाही
अन मिनटात निष्प्राण होते
तरी कधीच काही वाटत नाही

मसाल्यातील मांसाच्या दरवळीने
भाकरी होईस्तो धीर धरवत नाही
तोच रानटी आदिम शिकारी
अजून मनातून हटत नाही

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझी नर्मदा परिक्रमा

माझी  नर्मदा परिक्रमा  ***************** दिनांक 8 फेब्रुवारी 26 ते 27 जून 26 अशी 140 दिवसांची  परिक्रमा नर्मदा मैयेने पूर्ण करून...