गुरुवार, १९ मार्च, २०१५

कळत नाही





आशेचा शेवटचा
चिवट थेंब
निग्रहाने मनातून
निपटून टाकला
आज सारे आकाश
का भरून आलेय  
कळत नाही |
कालच कुंडीतील 
कबुतराचे घर
काढून फेकले
अंडयासकट
गुलाब का कोमेजला
कळत नाही |
ती गेली सहजच
बोलून की
आपलं कधीच
जमणार नाही
या शहरात  
डोळ्यांची साथ
आलीय नक्कीच |

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कोरलेले

कोरलेले लिहले मनात काही पुसता सहज येते ह्र्दयात कोरलेले मिटता कधी न येते  असतेच विश्व छोटे  अदृष्य कधी कधी ते  आकाश चांदण्याचे ह...