गुरुवार, १९ मार्च, २०१५

कळत नाही





आशेचा शेवटचा
चिवट थेंब
निग्रहाने मनातून
निपटून टाकला
आज सारे आकाश
का भरून आलेय  
कळत नाही |
कालच कुंडीतील 
कबुतराचे घर
काढून फेकले
अंडयासकट
गुलाब का कोमेजला
कळत नाही |
ती गेली सहजच
बोलून की
आपलं कधीच
जमणार नाही
या शहरात  
डोळ्यांची साथ
आलीय नक्कीच |

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बीज

बीज **** मी घेवून चार बीजे आलो माळरानावर  दूरवरच्या देशावर खरेच ते रखरखीत होते  आणि पाहिले डोकावून तिथल्या दऱ्या खोऱ्या  तर त्या...