शनिवार, २९ जून, २०१३

प्रश्न अधांतरी






निष्पाप कळ्या अकाली

पडती जेव्हा गळुनी

या न त्या कारणांनी

जातो मोहर झडुनी



काय म्हणावे असल्या

या शापित प्राक्तनाला

लागे ना अर्थ इथला  

मज कश्याचा कशाला



असे जन्म काय सारा

अपघात मालिका हि ?

नच माझ्या हाती काही

वा न तुझ्या हाती काही



मरणात थांबलेले

प्रश्न अधांतरी सारे

मज नकोच कुणाची

उगा छापील उत्तरे



विक्रांत प्रभाकर

http://kavitesathikavita.blogspot.in/




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...