मंगळवार, १२ फेब्रुवारी, २०१३

विहिरीच्या काठावर



विहिरीच्या काठावर
उभी सोडुनिया दोर
मनातला घाव मागे    
गर्द हिरवा अंधार  
किती प्रेम शिंपायचं
किती नाते जपायचं
मन चिंध्या झाल्यावर  
कुणा काय सांगायचं २
ठोठावून दार दार
वळ आले हातावर
कुणी कधी ऐकले ना
उरी गारठले स्वर ३
कुठे तरी अंधारात
सारे सारे विसरावं
खोल खोल ऐकांतात
बंध तोडूनिया जावं ४

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

भक्ताचिया गोष्टी

भक्ताचिया गोष्टी ************** भक्ताचिया गोष्टी डोळा आणी पूर  भावनांनी उर भरू येई ॥१  आहाहा किती रे भाग्याचे पाईक  पातले जे सुख...