रविवार, २३ डिसेंबर, २०१२

वखवखल्या विक्राळ जगी या






वखवखल्या
विक्राळ जगी या
पडला प्रश्न.

कसे ठेवावे
प्रियतम आपुले
फूल जपून.

चिंतेने मग
भयव्याकूळ झाले.
ते प्रियजन

हवे फुलाया
नच येत ठेवता
बंद करून .

पण बाहेर
भेसूर नराधम
क्रूर भयाण.

राक्षसगण
वा श्वान पिसाळले
बसले टपून.

कोण तयाला
करतील शासन
विलंबाविण.

कुकर्मा आधी
अविचारी हात ते  
टाके ठेचून.

शिवरायांचे
न्याय निष्ठुर जसे
होते शासन.

हात कापरे
अन बधीर व्हावे
दुर्जन मन.

असेच काही
भर रस्त्यात वा
यावे घडून.

तया पाहून
मग गळून जावे
त्राण तमाचे.

आणि चुकून
नच विचार यावे
मनी पापाचे.

विक्रांत प्रभाकर

http://kavitesathikavita.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कृपा कल्लोळ

कृपा कल्लोळ  ******* काय माझी गती अन्  काय मती  तुझं दयानिधी भेटू शके काय माझी श्रद्धा काय ते साधन  तुज बोलावून घेऊ शके  अवघा दे...