गुरुवार, २० डिसेंबर, २०१२

अभिलाषा




अभिलाषा हि
भविष्यातील आसक्ती असते
आणि प्रत्येक आसक्तीत
अंतर्भूत असतात
भीती मत्सर द्वेष चिंता
अन सर्व व्यापी पराधीनता
या पराधीनतेतून
जावे वाटते मुक्त होऊन म्हणून
सुखभोगाचा मानसन्मानाचा यशाचा
पाठलाग करते मन
अन जाते स्वत: पासून दूरवर पळून
पण जेव्हा जाते भूल उतरून
आणि वेदना घेते वेटाळून
तसेच मन पुन्हा
तडफडते होते उदासीन
या पाळण्यातील निरर्थकता जाणून
कुणीतरी या आसक्तीतून
मुक्ती देईल  म्हणून
धावते मठ मठातून
मग त्याला मिळते मुक्तीचे आश्वासन
सोबत त्याच्या असतात पण
अटी,पाळायचे नियम, कडक व्रताचरण
याचे यथावकाश  फळ
"निरासक्ती " नक्की मिळेन
सांगीतले  जाते आवर्जून
पण या फळाची आसक्ती
कशी देऊ शकेल निरासक्ती......?
अभिलाषेपासून  मुक्ती.......?

 विक्रांत प्रभाकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मनशून्य

शून्य **** मनाच्या गाभारी प्रगटले शून्य  जन्म प्रश्नचिन्ह पांघरले ॥१ मोडले पडले इमले बांधले  स्वर्गावरी गेले स्वप्न वेडे ॥२ वात ...