सोमवार, १५ ऑक्टोबर, २०१८

वृंदा



वृंदा
***** 
वृंदा तुला करायचं होतं का
लग्न विष्णूशी कधी
जालिंदरचा मृतनंतर ?
तू सती गेली 
त्याच्या प्रेमासाठी 
देहा चे बलिदान करून 
प्रेमाचा तात्कालीन 
अंतिम उद्गार 
वास्तवात आणून
पण तुझ्या मृत्यूनंतर 
बलिदानानंतर ही 
त्यांनीतोडून टाकला
तुझा अन् जालिंदरचा संबंध 
कायमचाच
त्यावर घालून 
प्रभू प्रेमाचा आवरण 
आणि आम्ही मिरवतो आहोत 
देवाचे दुष्कृत्य पुन्हा पुन्हा
आणि करतो आहोत 
विटंबना तुझी पुन्हा पुन्हा 
हे पतिव्रते प्रेम सरिते 
तुळसे माये 
त्याबद्दल आम्हाला क्षमा कर
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोभ

लोभ ****** फुटली उकळी  गाणे आले गळा  प्रेमे उजळला  गाभारा हा ॥ १ शब्द सुमनांनी  भरले ताटवे भ्रमराचे थवे  भावरूपी ॥ २ पसरला धूप  ...