शनिवार, ५ एप्रिल, २०१४

अण्णा पाटील गेले तेव्हा ,,



एक लढाई अस्तित्वाची होती संपून गेली   
समोर त्या देहाची होती फुले विझली
आकंठ संसारात ते मग्न मुली नातवात
हिंदोळ्यावर सुखाच्या सदा होते झुलत 
सारे काही होते त्यांच्या मनासारखे झालेले
सुखा समाधानात होते आयुष्य चाललेले 
नाकासमोर पाहत निर्मळ जीवन
सदैव जगले आपल्या दृढ तत्वास धरून
घरा दारावर केले सदैव प्रेम भरभरून
उरात ठेवली मोट स्वप्नांची सांभाळून
आणि मग अचानक उभे ठाकले मरण
चार महिन्यात गेले सारे काही संपून
किती तरी स्वप्ने ठेवली होती कवटाळून
अचानक गेली होती तीही सारी संपून ...

हे खर आहे की मरण कुणाला चुकत नाही 
पण अस मरण कुणाला याव बर वाटत नाही
पूर्ण विरामाची जाणिव आतून उलगडावी
पाण्याची ओंजळ पाण्यात रिती व्हावी

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

होशी दत्ता

होशील दत्ता ********* कुणासाठी होशी दत्ता तू रे देव  स्वीकारशी भाव हृदयीचा ॥१ कुणासाठी होशी दत्ता तू रे बाळ  कृपाळ प्रेमळ लीलाधर...