गुरुवार, ९ जानेवारी, २०१४

प्रवास (नर्मदाकाठच्या कविता )









सर्वदूर केवळ
पाण्याची खळखळ
अन पायाखाली
पाचोळ्याची सळसळ  
कुणीही नाही
आजूबाजूला
अथवा कुणाची
चाहूल कानाला
किती चालायचे
माहित नाही
किती चाललोय
माहित नाही
मनाला त्याची
मुळी शुध्दच  
उरली नाही
पोहोचणे किंवा
न पोहोचणे यास
जणू आता
काही अर्थच
उरला नाही
अस्तित्वाच्या
कणाकणात
विरघळलेली
तुझी साथ
श्वासाच्या
अंतापर्यंत
हवी हवीशी
वाटणारी ..
थबकली पावुले
वाटले मनास
इथेच हा पथ
संपावा प्रवास

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सुटू द्यावे

सुटू द्यावे ******* असते सदैव साथ का कुणाची  सुटतात हात सुटू द्यावे ॥ खेळ जीवनाचा पहायचा किती  मिटतात डोळे मिटू द्यावे ॥ हातात न...