ज्या एका क्षणी
कळते आपल्याला
जीवनाची व्यर्थता
त्यात असलेल्या
सुखदुःखाच्या
घट्ट मोळीसकट
आपण एक
बहाणा शोधतो
ती व्यर्थता
सदैव नाकारतो
"तसा तर
सूर्यास्त रोजच
होत असतो.."
आपण म्हणतो
जेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)
प्रार्थना ******* जाहले दर्शन तृप्त झाले मन देखीले सगुण परब्रम्ह हास्य मुग्ध मुखी हात उंचावले आशिष भरले प्रेममय परमपवित्र ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा