गुरुवार, ३० ऑगस्ट, २०१२

दंगल


    मैदानाचे झाले रण 
    जळले  नंदनवन
    बेसावध जन गण
    द्रोहास आले उधान

    झाली किती वर्ष तरी
    देश अजुनी विछिन्न

    तिथे एक पाकिस्तान 
    इथेही एक अजून 
     

    द्वेष या मनामनात 
    दाट कडवटपण
    वरवर आच्छादन
    आत जहरी कृपाण

    रटरटणारी भिती  
    वर  मैत्रीचे  झाकण
    उगा जरा   हलविता
    येते हिंसा  उसळून

    विक्रांत प्रभाकर

    http://kavitesathikavita.blogspot.

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

    टिप्पणी पोस्ट करा

    कोरे पान

    कोरे पान  ******** बोल सखीचे चैत्र चांदणे नसून शब्दी उगा सांडणे  गूढ नव्हते गुपित काही  झऱ्यागत ते मुक्त वाहणे काही घटना काही घड...