मंगळवार, ११ ऑक्टोबर, २०१६

तीन ज्ञानी






तीन ज्ञानी
गेले मठात
शब्द घेवून
काही ओठात |
मिटले डोळे
शिरले मौनात
नाद उमटे
मन हृदयात |
झांजा वाजती
खणखणखण
डफ बोलतो
दणदणदण |
अलख अलख
वदल्यावाचून
शब्द येतात  
हृदयी कुठून |
मेघ भारले   
वेधून घेती
चैतन्याच्या   
लाटा फुटती  |
भावभोळा
अर्थ जाणतो
समर्पणाला
साद घालतो |
निरंजनाच्या
पाठी पोटी
उरा उरी अन
झाल्या भेटी |

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/

सोमवार, १० ऑक्टोबर, २०१६

ओळीवरून कविता (माझ्या मनाप्रमाणे काहीच होत नाही)








माझ्या मनाप्रमाणे काहीच होत नाही
असे म्हणणे म्हणजे
मूर्खपणा बाकी काही नाही
सारेच मनासारखे कश्याला व्हायला हवे
निवडूंगावर गुलाब का यायला हवे
मी काय असे पुण्य केले
की टाटा बिर्लाच्या घरात डोळे उघडले 
आपण तगर आहोत ना मग वास नाही
म्हणून रडण्यात अर्थ नाही
आपण गरुड नाही म्हणून कधी   
चिमणी उडायचे सोडत नाही
ज्याला असते रडायचे
काम सोडून बसायचे
त्यालाच असतात बहाणे करायचे
रडणे भेकणे सोडून दे
दु:ख वाऱ्यावर सोडून दे
जसे आहे तसे जीवन
मिठीत घेवून जगून घे
शेवटी  हे ध्यानात ठेव
मनाप्रमाणे काहीच होत नाही
असे म्हणतो त्याच्या घरी
सकाळ कधीच होत नाही
जे तुला कधीच नको असते
किंवा नसल्याने काहीही
बिघडणार नसते
ते तुला कधीच मिळत नसते
प्राणातून उमटू दे आकांक्षा
मनातून नको
ती पूर्ण करण्यास
विश्वात्मा बांधील असतो
हे सनातन सत्य आहे

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/





शुक्रवार, ७ ऑक्टोबर, २०१६

हृदयी ठेवी दत्त भगवान





मना करी रे करी ध्यान
हृदयी ठेवी दत्त भगवान ||
मना सांडी रे सांडी व्यथा
जना सांग धन्य गुरुकथा
गुरुचरित्र असे हे तारक
तुटे कोटी जन्म बंधन ||१ ||
मना चाल रे चाल शिखरी
देव दत्त बघ गिरनारी
काय वर्णू तेथची बात
कणकण गर्जे दत्त गाण ||२ ||
मना जाई रे जाई कृष्णातीरी
गुरुपीठ श्री गाणगापूरी
दंड धरून गुरु नृसिंह
भक्ता रक्षी रूपी निर्गुण ||३||
मना थांब रे थांब क्षणभर
प्रेमे आळव दत्त दिगंबर
घडो वा न घडो तप ध्यान
प्रभू येतील रे धावून ||४ ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/




भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...