मंगळवार, २ सप्टेंबर, २०१४

कडवट क्षण







असे इतके कडवट 
असतात काही क्षण
कि उद्दिग्न विस्कळीत 
होते आपलेच मन

अरे कश्यासाठी अन
का हे अवघे म्हणून ?
पिंजारात भणाणत 
असतात व्यर्थ प्रश्न 

अश्यावेळी जाती सारे  
अर्थ भान हरवून
पायाखालती कळ्याही 
जातात मग चिरडून 

अस्तित्व भरुन अंती
उरे एक आक्रंदण
जाणवून जाते मन 
संवेदना बधिरून

आपलेच जीव प्राण
ओझे आपणा वाटून
घेतो वार धारधार 
स्वत:वरच करून

सगळाच अर्थ जातो
मग विच्छिन्न होवून
चालते जीणे ओढत 
मढे  मरणावाचून

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे



सोमवार, १ सप्टेंबर, २०१४

मेलेल्या वाटेला







आज मेलेल्या वाटेला
थोडे जावुनिया आलो
चार पावुले विषारी
जरा चालुनिया आलो

रक्त शिंपले तरीही
नच उगवले काही
न ये डोळ्या मध्ये पाणी
खाचा करुनिया आलो

प्राण जपावे कशाला
अर्थ नसे जगण्याला
उगा कुठेतरी पण
जीव टांगुनिया आलो 

माझा उसवला श्वास
ठोके मोजतो अजून
लाल धमन्यात मीच 
मृत्यू टोचुनिया आलो

विक्रांत प्रभाकर
 

अशोक कोकणे श्रद्धांजली

अशोक कोकणे श्रद्धांजली  *********** महाड मधील आमचे घरमालक कोकणे, भाई अन् ताई यांना असलेली पाच मुले, विजय दिलीप अशोक प्रदीप आणि र...