शुक्रवार, २ फेब्रुवारी, २०१८

तर काही घडे




जे नव्हते ते गेले
तेव्हा हाती जे नुरले
कुणी तयास हरवले
म्हणावे का ।।

इया ग्रहणाचिया काला
चंद्र हरवून गेला
ऐशा दुःखाने व्यापला 
तो शहाणा काय ।।

धावे उदंड हे मन
जागा सोडल्यावाचून
जागा पाहता शोधून
मरे शोधणारा ।।

वृत्ती निवृत्तीच्या मागे
भान क्षणभर जागे
तया स्मृतीचे ते धागे
होय फास पुन्हा ।।

बोलू जातो ते सारे
आहे अज्ञानचे वारे
होई विक्रांत उगा रे
तर काही घडे।।


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रार्थना

प्रार्थना ******* जाहले दर्शन तृप्त झाले मन  देखीले सगुण  परब्रम्ह  हास्य मुग्ध मुखी हात उंचावले  आशिष भरले  प्रेममय  परमपवित्र ...