शुक्रवार, २० मे, २०२२

श्लोक १६.४ व १६.५ .श्री ज्ञानराज माणिक प्रभुजी महातराज गीता यज्ञ आधारीत.

श्लोक १६.४ व १६.५  .श्री ज्ञानराज माणिक प्रभुजी महातराज  गीता यज्ञ आधारीत.
*****************::
दैवी गुणांचे वर्णन केल्यानंतर आज श्री जी असुरी गुणा बद्दल सांगत आहेत .

आसुरी गुणांमधील पहिला गुण म्हणजे दंभ हा आहे 
दंभ म्हणजे आपण जे नाही ते दाखवणे आपल्यात नसलेल्या गुणाचे खोटे प्रदर्शन करणे किंवा ते आपल्याच आहे असे भासवणे . उदा. भित्र्या माणसाने आपण फार शूर आहोत असा आव आणणे.

दर्प म्हणजे ,मी फार कुठेतरी मोठा आहे असे भासवणे किंवा असे स्वतःलाच वाटणे .आपल्या जवळ असलेल्या प्रत्येक गोष्टीचा गर्व वाटणे .उदा घर गाडी बंगला धन  इत्यादी. ममत्व हा दर्पाचा स्थायी भाव आहे 

अभिमान म्हणजे जे आपल्या मध्ये जे आहे ते मिरवणे त्याबद्दल अहंकार बाळगणे .  उदा .रूप  कला गुण जसे की गायन नृत्य वकृत्व इत्यादी.
हे सारे गुण देवाने दिलेले असतात .ते त्याचेच दैवी गुण असतात .ते आपले म्हणणे हे देवाला कसे अवडेल .अहंता दर्पाचा स्थायी भाव आहे .

अश्या रितीने जिथे अहंता ममता तिथे आसुरी गुण .

पारूष्य म्हणजे ताठा , कठोरता .
ताठा (अकड) असलेल्या व्यक्तीची तुलना श्री जी नी मेलेल्या व्यक्तीशी केली आहे .मरून पडलेल्या मुडद्याशी केली आहे .देह मेल्यावर ताठ होऊन जातो त्याप्रमाणे या ताठ माणसाची अवस्था असते 
अज्ञानाबद्दल ते सांगतात ,ज्ञान हे सापेक्ष असते कधीकधी वर पाहता जे ज्ञान असते तेच अज्ञान असते .जसे की अणू बॉम्बचा शोध लावलेले शास्त्रज्ञ ज्ञानी वाटतात परंतु ते ज्ञान माणसाच्या विनाशाला कारणीभूत होते ते अज्ञानच होय. कोरोना व्हायरसचा जंतू निर्मान करणारे ज्ञान हे अज्ञान तर कोरोनाव्हायरस ची लस शोधून काढणारे ज्ञान हे खरोखर ज्ञान होईल .

क्रोध म्हणजे रागावणे ,चिडणे. श्री जी इथे पुन्हा वर अक्रोध मध्ये उल्लेख केलेले क्रोधाचे वैशिष्ट सांगतात जसे की क्रोधा विनाकारण नसतो त्याला कारण लागतं .कामना फलद्रुप न होणे हे ते कारण असते तसेच क्रोध हा सर्व नाशाचे कारण आहे असेही ते .सांगतात .ते सांगतात रामायण का घडलं तर कैकयीच्या क्रोधामुळे कळलं तसेच रावणाच्या क्रोधामुळे घडले .
महाभारत का घडलं द्रौपदीच्या क्रोधामुळे घडलं दुर्योधनाच्या क्रोधामुळे घडलं तसेच भगवंताच्या क्रोधामुळे घडलं .

हि सारी दैवी संपति कशाला गोळा करायची आहे तर मोक्षा साठी.मोक्ष कुणाला हवा असतो . तर याच दैवीगुण युक्ताला .
सारे काहि असुनही या जन्ममृत्युच्या चक्रातून बाहेर पडायची इच्छा असते पुढचा जन्म कुठला असेल ते आपल्याला माहित नसते पुढच्या जन्मात कुठल्या दुःखातून जावे लागेल त्याची ही खात्री नसते शाश्वत सुखासाठी  आनंदासाठी प्रत्येकाला मोक्ष हवा असतो .
तर आसुरी शक्ती ही सदैव बंध निर्माण करते

 त्यामुळे भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतात की हे अर्जुना तू शोक करू नको कारण तू दैवी संपत्ती घेऊन जन्माला आलेला आहेस .
ज्याअर्थी अर्जुनच्या मनामध्ये करुणा  निर्माण झाली त्याअर्थी अर्जुना मध्ये दैवी गुण संपत्ती आहेच. परंतु समोर असलेल्या व्यक्ती ही आपली माणस आहेत आपली भाऊ काका मामा असे आहेत हे आपले पण ज्या क्षणी जन्मालआले तो मिश्र गुणी झाल. त्याच्यात असुरीगुण प्रादुर्भाव झाला त्यामुळे भगवंताला त्या गुणाला दूर करण्यासाठी ही गीता सांगावी लागली. पण मुळात तो दैवी पुन्हा युक्त होत।

आधारीत .
श्री ज्ञानराज माणिक प्रभुजी गीता यज्ञ



गुरुवार, १९ मे, २०२२

श्री जींच्या प्रवचनाचा दुसरा दिवस श्लोक 16.2 व 16.3


श्री जींच्या प्रवचनाचा दुसरा दिवस श्लोक 16.2 व  16.3
काल आठवतांना एक पहिला मुद्दा मी विसरून गेलो होतो त्यावेळी  श्रीजी सांगत होते की संपत्ती म्हणजे काय ?
हा अध्याय दैवी संपत्ती असुरी संपत्ती अन राक्षस संपत्ती त्यावर आधारलेला आहे. तर संपत्ती म्हणजे काय श्रीजी म्हणतात संपत्ती म्हणजे तुमच्या कडे असलेले सगळं काही धन दौलत पैसाअडका स्थावर जंगम व्यवहारांमधील संपत्ती असते परंतु अध्यात्मिक जगामध्ये संपत्ती ही वेगळी असते आणि ती संपत्ती म्हणजे दैवी गुण असतात.
 संपत्तीच्या मोबदल्यात आपण काहीतरी घेत असतो देत असतो म्हणजेच संपत्तीची अशी व्याख्या करता येते की जी वस्तू देऊन आपण काहीतरी घेऊ शकतो. तर ही दैवी संपत्ती अशी आहे ती देऊन आपण   मोक्ष मिळू शकतो. तर  ज्याला मोक्ष हवा मुक्ती हवी त्याला दैवी संपत्ती प्राप्त केल्याशिवाय पर्याय नाही.


आज श्री जी सांगत होते  दैवी गुणा बद्दल
 १० वा अहिंसा हा  दैवी गुण आहे अहिंसेचा अर्थ विशद करताना ते म्हणतात अहिंसा हा परम धर्म आहे हे खरंच परंतु त्याच्या पुढील जे वाक्य आहे हे बहुतेकांना माहिती नाही ते म्हणजे धर्मासाठी केलेली हिंसा हाही धर्मच असतो. भगवान कृष्णाने घडवून आणलेली हिंसा, कुरुक्षेत्र युद्ध ही धर्मासाठी होती म्हणून ती परमधर्मा मध्येच मोडते त्याचप्रमाणे देश, धर्म, देवासाठी केलेली हिंसा ही धर्मा मध्येच मोडली गेली पाहिजे .अन्यायाविरुद्ध अत्याचाराविरुद्ध केली गेली हिंसा हि अहिंसाच असते.

हिंसा तीन प्रकारचे असते कायिक वाचिक आणि मानसीक
 देहाने कुणाला न दुखावणे त्रास न देणे इजा न पोहोचणे मनाने कोणाबद्दल वाईट न चिंतने वाईट न बोलणे अपयश न चिंतने  हे मानसीक तर वाचिक अहिंसा म्हणजे कुणाला वाईट वाटेल असे न बोलणे कर्कश्य न बोलणे अपमानास्पद न बोलणे इत्यादी.

11 अकरावी दैवी संपत्ती किंवा गुण हा सत्य आहे सत्य बोलावे रुजू बोलावे कुणाला न दुखेल असे बोलावे. सर्व आचरण हे सत्याला धरून असावे .मनात एक आणि बाहेर एक असे न वागणे असते. तसेच सत्य भाषण सुद्धा दुसऱ्याला दुःखदायी होणार असेल तर न बोललेलेच बरे.

12. बारावी दैवी संपत्ती किंवा कोण हा अक्रोध आहे अक्रोध म्हणजे शब्दात सांगायचं तर न रागावणे. पुन्हा अक्रोधा सुद्धा श्री जी म्हणतात की भगवान श्रीकृष्णाला सुद्धा क्रोध आला होता त्यांनी क्रोध केला होता उदाहरणार्थ शिशुपालास 99 प्राप्त होईपर्यंत त्यांनी अक्रोध जपला होता परंतु शंभर वा अपराध केल्यावरती त्यांनी त्याचा वध केला होता तसेच रणांगणामध्ये आपले भक्त आणि जिवलग मित्र अन सैन्य भीष्मा कडून पराभूत होत  मारले जात आहेत हे पाहून क्रोधाने रथाचे चाक घेऊन ते भीष्मावर धावून गेले होते. याचा अर्थ क्रोध हा अस्वाभाविक नसतो परंतु तो सत्वागुणाच्या आधाराने उभा राहिला तर तेजाला साहाय्यक होतो.

तसेच श्री सांगतात की क्रोध हा अवलंबून असतो तो एकटा कधीच नसतो क्रोधाच्या अगोदर काम हा असतो कुठलीही कामना पूर्ण होत नाही तिला अडथळा येतो त्या वेळीच क्रोध उभा राहतो.

13 तेरावा गुण हा त्याग आहे . हा गुण समजावताना श्रीजी सांगतात की ज्या वेळेला गरुड आपल्या चोचीमध्ये मांसाचा तुकडा घेऊन फिरत असतो त्या वेळेला त्याच्या पाठीमागे खूप कावळे लागतात आणि त्याला बेजार करून सोडतात पण ज्या क्षणी तो मांसाच्या तुकड्याचा त्या करतो त्या क्षणी ते कावळे मांसाच्या तुकड्याकडे निघून जातात आणि गरुडाला सुख शांती मिळते.

14. 14 वा गुण शांती आहे..याचे वर्ण न मला आठवत नाही


15.  अपैशुनम हा पंधरावा गुण आहे पैशुनम् म्हणजे कोणाबद्दल तरी वाईट बोलणे चुगली चहाडी करणे.टिका करणे.
 चुगली करणे माणसांमध्ये हा फार मोठा दोष आहे ती ज्या वेळेला दोन व्यक्ती भेटतात त्यावेळेला बोलण्याच्या नादात ते तिसऱ्याची निंदा करतात ती  करतात त्यातून ते स्वतःलाच  पापाचे भागीदार बनवतात. ते  खिरीत गरुडाने पकडलेल्या सापाच्या मुखातील वीज पडून मेलेल्या ब्राह्मणाची गोष्ट सांगतात.अन ते पाप कोणाला असा प्रश्न उपस्थित होतो त्यावेळेला साप का गरुड का आचारी का राजा ही कोणीच पापाचे तसे जबाबदार नसतात. परंतु त्या घटनेची निंदा करणाऱ्या व्यक्तीला  या दहा ब्रह्महत्येचे पाप यमधर्म देऊन टाकतो. या गुणाचे महत्व  सांगण्यासाठी ही गोष्ट पुरेशी आहे.
16  दया  कुणाबद्दल सांगताना श्री सांगतात परमेश्वर दयाळू आहे म्हणजे काय आहे ज्या वेळेला तुम्हाला सर्व परिस्थिती अनुकूल असते हीच परमेश्वराची दया असते. दये बद्दल सांगता सांगता ते सांगून जातात कृपा म्हणजे काय तर परमेश्वर ज्या वेळेस तुम्हाला अनुकूल नसलेली परिस्थिती निर्माण करतो. दु:खद परिस्थिती निर्माण करतो की त्याची कृपा असते जेणेकरून त्यामधून तुमचे जमलेले पाप तो शोषून काढत असतो आणि तुम्हाला आपल्या जवळ येण्यासाठी मदत करत असतो.
दया हा गुण कसा असावा तर दया सर्व भूतान प्रति असावी केवळ आपली लोक आपले नातेवाईक त्यांच्या बाबतीतच दया उत्पन्न होऊ नये प्राणी जसे गाई कुत्रा मांजर इत्यादी सर्व प्रकारच्या पशु बद्दल पक्षांबद्दल मनात दया उपजयला हवी .भुतप्रेम ही दयेची अभिव्यक्ती आहे

17 अलोलुप्त्वं17 वा गुण किंवा दैवी संपत्ती आहे लोलुप्य म्हणजे एखादी गोष्ट अतिशय हवी असणे तिचा हव्यास वाटणे.त्या गोष्टीचे व्यसन लागणे

18. मार्दव भव्य म्हणजे सोफ्टनेस मृदुता कुणालाही न दुखावणे.

19ह्रिर म्हणजे.लज्जा . आपण करत असलेल्या कृत्याबद्दल जर, ते कृत्य योग्य नसेल त्याबद्दल लज्जा निर्माण होणे आणि त्यातूनच पश्चातापाची भावना उदय असणे हा दैवी गुण असा आहे. निर्लज्ज माणसे ही एक प्रकारे कठोर असतात आणि त्या कठोर तेथून ते योग्य निर्णय घेतात.

20 अचापलम म्हणजे अस्थिरता अन चंचलतेचा अभाव.
मनामध्ये उठलेले विचार विकार यांचे शरीरावर  प्रतिबिंब न उमटू देणे, स्थिर राहणे. किंबहुना  मनाचे छान चांच्यल वाढेल अशा गोष्टी न करणे.

21 तेज म्हणजे तेजस्विता. अन्याय आक्रमकता अत्याचार या विरुद्ध उभे राहण्याची शक्ती, गुण म्हणजे तेज होय. श्री जी नी याठिकाणी आपल्या देशावर होणाऱ्या आक्रमणाला दिलेल्या उत्तराची उपमा दिलेली आहे अगदी सार्थ आहे.
22. क्षमा या बद्दल बोलताना श्रीजी म्हणतात क्षमा ही त्याचीच असते कि ज्याला दंड करण्याचे सामर्थ्य असते .परंतु तो ते न करता त्या व्यक्तीला माफ करतो
दुबळा माणूस क्षमा करू शकत नाही ती क्षमा म्हणजे त्याचा नाईलाज असतो. तसेच क्षमे चे प्रकार सांगताना, ते मोहग्रस्त क्षमा हा प्रकार सांगतात मुला बद्दल वाटणारी बापाचे जो मोह असतो त्यामुळे तो मुलाचे अपराध पोटात घालून त्याला क्षमा करत असतो
23 धृती म्हणजे धैर्य श्री जी नी हा गुण फारसा विशद केला नाही पण धैर्य म्हणजे संकटामध्ये उभा राहण्यासाठी आवश्यक असलेला गुण आहे रणांगणातून पळ न काढणे, शत्रूला सामोरे जाणे अन्याया समोर उभा राहणे या सार्‍या गोष्टी धैर्यवान व्यक्तीच करू शकतो. त्याच पायावर तीच तेजाची इमारत उभी असते.
24 शौच म्हणजे स्वच्छता ही स्वच्छता सुद्धा देहाची मनाची आणि वाचेच्या असावी लागते. देहाची स्वच्छता आहे ती स्नानादी  गोष्टींनी होत असते. मनाची स्वच्छता मनात सद्गुणाचे संवर्धन करून होत असत। वाचेची स्वच्छता ही सत्य वचनाने मधुर भाषणाने होत असते
25 अद्रोहो  अहो म्हणजे मनात आपण समोरच्या व्यक्तीबद्दल जे वाईट विचार करतो ते होत. आपण समोर त्या व्यक्तीबद्दल तोंडावर चांगले बोलतो, गुणगौरव करतो पण मनी त्याचे वाईट चिंतेत असतो. त्याच्या वाईट झाले तर मनाला आनंदी होत असते, भले आपण त्याच्याबद्दल वाईट कृती करत नाही परंतु त्याच्याविरुद्ध वाईट कृती करायचे विचार आपल्या मनात अनेकदा येत असतात हे असे न घडणे यास  अद्रोह असे म्हणतात
26 सव्विसावा दैवी गुण म्हणजे न अति मान्यता स्वतःबद्दल कुठल्या प्रकारच्या मोठेपणाची आवड नसणे .आपण कोणीतरी मोठे आहोत अशी ग ची भाषा नसणे हे अमानीत्व, बऱ्याच वेळेला कुणाला अधिकार मिळतात, पदामुळे मिळालेले अधिकार, नशिबाने मिळालेले अधिकार पण हे त्या व्यक्तीला कळत नाही.की ते त्या पदाला खुर्चीला मिळालेले आदरातिथ्य मानसन्मान स्वतःचेच असे मानून घेतो .तर त्याबद्दल सावध राहणे व तो मान मान्यता आपले नाही हे ज्यांना कळते ते अमानित्व.

हे गुण दैवी संपत्ती जी जन्मला घेऊन आलेल्या मनुष्याची असतात.
*****
श्री.ज्ञानराज माणिक प्रभु महाराज

बुधवार, १८ मे, २०२२

श्री जी चे प्रवचन सार दिवस १

श्री जी चे प्रवचन सार 
*********†*****

ठाणे येथे ज्ञानेश्‍वर मंदिरात निवृतीनाथ सभागृहांमध्ये श्री ज्ञानराज माणिक प्रभू यांची भगवद्गीतेवर प्रवचन चालू आहेत त्यातील पहिल्या प्रवचनाचे सार सहज आठवेल तसे देत आहे.
***

भगवद्गीता हीच ही एकंदर तीन भागात वाटली गेली आहे पहिला भाग एक ते सहा अध्याय कर्मयोग सहा 7ते 13अध्याय भक्तियोग 14 ते 18 ध्यान ध्यान योग किंवा प्रॅक्टिकल.
अर्थात हे विभाग (ग्राॉसली) स्थुळ आहेत .

त्यापैकी सोळाव्या अध्यायामध्ये दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती त्याचे विश्लेषण भगवान करत आहेत 
याआधीचे म्हणजे 14 ,15 यामध्ये भगवंतांनी वर्णन केलेले आहे ,ते म्हणजे मीच सर्वकाही आहे आणि माझ्या पर्यंत पोहोचल्यावर  कुणी हि मागे परत येत नाही . या अर्थाने ज्ञान  सांगीतले आहे

भगवंतांनी पहिल्या चार लोकांमध्येच 27 दैवी गुण कोणते ते वर्णन केले आहे बाकी उरलेल्या चोवीस श्लोकांमध्ये आसुरी आणि राक्षसी गुणांचे वर्णन केले आहे

राक्षस कोण तर जे द्वेष करतात ते .हे राक्षस धर्माचा, गुणी लोकांचा, देशाचा,  यशाचा द्वेष करतात.
आणि जे सदैव शरीर मग्न असतात ते असूर त्यांना दैवी गुण तर आवडतच नाही त्यांना फक्त खावो-पिवो मजा करो हेच आवडते
हेच   त्यांच्या जीवनाचा सूत्र असते त्यापलीकडे जीवन जगणे आहे यावर तुमचा विश्वास सुद्धा नसतो

पहिला दैवी गुण अभय(१). 
अभय असणे आणि निर्भय असणे यात फरक आहे  गुंड दरोडेखोर हे सुद्धा निर्भय असतात पण पोलिसांना पकडल्यावर ते शिक्षेला सामोरे जातांना त्यांच्यातील भय उघड होतं 
अंतरात  ते भयभीत असतात. त्यांचे  भय दाबण्यात आलेलं असतं .अभय खरोखर सर्वकाळी सर्व देशी सर्वत्र समान असते. मनामध्ये अभय निर्माण होण्यासाठी भक्ती आणि विवेक असावे लागतात दोन गोष्टीच अभय निर्माण करतात जगात प्रत्येक गोष्टीला भय असते उदा. चोराला राजाची किर्तीला अपयशाची भीती असते इत्यादी
दुसऱ्या गुण (२)आहे सत्व संशुद्धी  सत्व म्हणजे अंतकरण .अंतकरणाची शुद्धी 
सं शोधन म्हणजे संपूर्ण मुळातून सर्वथा .
अंतकरणाचे मन बुद्धी चित्त इत्यादी 4 भाग असतात अंतकरण चतुष्टय असे त्यास म्हणतात 
सर्वांची शुद्धी होणे फार महत्त्वाचे आहे

तिसरा गुण(३) आहे ज्ञानयोग व्यवस्थिति म्हणजे ज्ञान योगात स्थिर होणे. महाराज याला ट्रेनमधून खाली उतरल्यावर ते पाच मिनिटांसाठी इडली वडा खाण्याचे उदाहरण देतात म्हणजे प्रत्येक क्षणी प्रत्येक मिनिटाला आपल्या मध्ये ज्ञान मिळवायचे ओढ जागी राहिली पाहिजे लक्ष  ज्ञानाकडे असले पाहिजे

चौथा (४)गुण दानाचा आहे दानाला आपल्या धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे दाना मुळे आपली आसक्ती कमी होते. आपल्याला मरताना सगळं सोडून जायचं आहे त्यामुळे सोडायची सवय लागणं  महत्वाचे आहे अन्यथा लोभग्रस्त होऊन मन आपल्या वस्तू मध्येच अडकून पडते. दानाचे महत्व यासाठी आहे की त्यामुळे आपण केलेल्या पापाचे परिमार्जन सुद्धा होते.
पाच(५) गुण हा दम, दमन आहे याचा अर्थ आपल्या इंद्रियावर नियंत्रण ठेवणे .इंद्रिय ही सदैव बहिर्गामी असतात डोळे रूपासाठी जीभ चवीसाठी त्वच्या स्पर्शासाठी आसक्त असते  त्याना तिथून फिरवून मनामध्ये स्थिर करायचे असते. असे आतमध्ये वळवायचे  कर्म  तेच दम
यज्ञ हा सहावा ६ गुण  आहे आपण जे काही करतो ते देवासाठी करणे आत्म्यासाठी करणे याचं नाव यज्ञ 
जेवणाआधी देवाचे नाव घेणे प्रार्थना करणे हा यज्ञ आहे पूजा प्रार्थना हे देवाचे आभार मानण्याचे साधन आहे थँक्स गिविंग आहे काही मागण्यासाठी पूजा-प्रार्थना नसते.हे सारे यज्ञ आहे

या पुढचा गुण (७) आहे तो म्हणजे स्वाध्याय. स्वाध्यायचे दोन अर्थ आहेत स्वत:चा अध्याय स्वतःचा अभ्यास. आपण दिवसभर काय केले कसे वागलो किती पुण्य केले किती पापे केली किती देवाजवळ होतो किती दूर होतो त्याचे निरीक्षण करणे. याशिवाय संतांचे वचन ग्रंथ गीता ज्ञानेश्वरी वाचणे हे सुद्धा स्वाध्याय आहे ..
पुढचा गुण (८)आहेत तप म्हणजे तपणे, तापवणे स्वच्छेने शरीराला कष्ट देणे कारण मरणाच्या वेळेला देहाला अनंत स्पष्ट होतात अनेक व्याधी आधी ग्रासून टाकतात त्यावेळेला मन त्यात गुंतून जाते आणि देवाचे स्मरण होत नाही म्हणून या देहाच्या कष्टांना सवय म्हणून आणि कष्टा मध्ये सुद्धा ती देवाकडे लागलेली असणे याची ही तयारी आहे किंवा शिक्षा पद्धती आहे असे म्हणता येईल. त्यापुढचा गुण (९)आहे तो म्हणजे आर्जव .आर्जव म्हणजे ऋजुता सोफ्टनेस बोलताना वागताना येणारी नम्रता.सरळता होय.

श्री ज्ञानराज माणिक प्रभू महाराज.प्रवचनातून 


मंगळवार, १७ मे, २०२२

नृत्य.


नृत्य
*****
चार क्षणात वीजाच
गेल्या चार चमकून 
जेव्हा तुझी पाऊले ती
गेली उगा थिरकून

जशी हवेच्या झोताने 
वेल जावी लहरून 
नवतीच्या हिर्वेपणी
भाव यावे बहरून 

गीत जणू तुच झाली 
शब्द उमटले देही 
स्वर जणू तुच झाली 
अर्थ उमटले पायी 

नुपुर नव्हते पदी 
तरीही मनी गुंजले 
शब्द जरी नच ओठी 
मनामध्ये ओघळले 

त्या क्षणावर लिहले 
जरी की नाव तू तुझे
एक गाणे मनामध्ये 
उमलून आले माझे 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘


सोमवार, १६ मे, २०२२

भोंदू गुरू

भोंदू गुरू 
*******:

जर तुमचा भोंदू गुरू 
तुम्ही टाकलात तर 
पडाल उघड्यावर 
म्हणून घाबरू नका 

डोळे घट्ट बंद करून 
वर भीतीची पट्टी बांधून 
सूर्य उगवणार नाही म्हणून 
स्वतः ला बजावू नका 

मान्य आहे मला की 
तुमची भक्ती आहे वादातीत 
तुम्ही आहात पूर्ण समर्पित 
पण लुटले जाऊ नका 

चुकतो आपण खूपदा 
वस्तू विकत घेतानाही 
म्हणून बाजार टाकत नाही 
तो तुमचा शोध थांबवू नका 

होतात अपघातही कधी 
गाडी चालवता चालवता 
चुकतो सिग्नल आणि फाटा 
म्हणून रस्त्यास दोष देऊ नका 

हा शोध महत्त्वाचा आहे 
तो लागो अथवा न लागो 
गंतव्य मिळो अथवा न मिळो 
पण चालणे सोडू नका 

इथे दु:ख अन वंचना आहे 
तितिक्षा अन परिक्षा आहे 
पण एक पूर्णता नक्की आहे 
ती अमोल संधी डावलू नका 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

रविवार, १५ मे, २०२२

भगवान गौतमबुद्ध

भगवान गौतम बुद्ध
**********
जर त्या युवराजाला 
नसतेच पडले प्रश्न 
जन्म मृत्यू अन जरेचे 
नसतेच उठले वावटळ 
अंतरात मुमुक्षुत्वाचे
तो राहिला असता रममान 
आपल्या सुखोपभोगात 
गुरफटलेला सुंदर पत्नीत
रमलेला छोट्या बाळात  
राजोपभोगात विलासात 
जसे राहिले जगले आणि मेले 
हजारो राजे-महाराजे 
तर हे जग 
आहे त्यापेक्षा 
खूपच विद्रूप झाले असते 

ते एक फुल फुलले पृथ्वीवर 
अन हजारो हृदयात 
नंदनवन फुलले 
असे नाही की या देशात 
संत झालेच नाहीत 
तत्त्वज्ञ जन्मलेच नाही 
योगी उपजलेच नाहीत 
ही भारत भूमी तर अशा 
अगणित रत्नांची खाणच आहे .
पाहता पाहता 
डोळे दिपून जावीत 
मोजता मोजता 
आयुष्य संपून जावीत 
पण हे रत्न वेगळेच होते 

त्यांनी प्रतिपादन केले सत्य 
सत्यावर असलेला प्रत्येकाचा हक्क
 नाकारली वर्ण व्यवस्था 
नाकारली जातीव्यवस्था 
नाकारला लिंगभेद 
आणि यातूनच जन्माला आला 
एक संपूर्ण मनुष्य धर्म 
प्रखर  प्रज्ञेवर आधारलेला 
प्रचितीस सत्य मानणारा 
करूणेने ओतप्रोत भरलेला 
सु - शीलतेने नटलेला 
तेथे स्पर्धा नव्हती 
प्रचार नव्हता 
बळजबरी ही नव्हती 

तो आकाशात पाझरणारा 
पूर्ण चंद्र होता 
भर वैशाखात शांती देणारा 
निशीराज होता 
हृदयात मांगल्य पवित्रता 
उदारता भरणारा 
सारी धग शोषून घेणारा 
शुभ्र मोगरा होता 

तो गौतम तर होताच कधी 
तो बोधीसत्व ही होता कधी 
पण भगवान बुद्ध झाला तेव्हा 
त्याच्यातून पाझरला 
तो दिव्य प्रकाश 
मानवाच्या मुक्तीचा 

दु:खातून मुक्ती
अज्ञानातून मुक्ती 
अंधकारातून मुक्ती 
भेदाभेदातून मुक्ती 
उच्चनीच स्त्री पुरुष 
सार्‍या भेदातून मुक्ती

म्हणूनच 
माणुसकी जाणणारा 
प्रत्येक मनुष्य करतो नमन 
शतवार त्या महायोग्याला 
महावीराला महानायकाला 
भगवान श्री गौतम बुद्धाला !
अन ध्यानाचे फुलुुन आलेले 
फुल अर्पितो त्या पद कमलाला !!

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

जखमेवर मीठ


जखमेवर मीठ 
*****:*****:

ज्याने माझ्या राजाला 
हाल हाल करून मारले 
त्याचे डोळे फोडले 
त्याची चामडी सोलली 
मेल्यावरही तुकडे तुकडे 
करून टाकले 
आपल्या राक्षसी वृत्तीने 
कोत्या खुज्या श्रद्धेने
असंख्य मंदिर तोडली 
देव फोडली देऊळं लुटली 
त्यावर उभी केली 
त्याची श्रद्धा स्थान 

ज्याने माझे हजारो 
बंधू कापून काढले 
ज्याच्या सरदारांनी 
आणि शिपुर्ड्यानी 
माझ्या लाखो माय बहिणींना 
बलात्काराने ओढून नेले 
जनानखान्यात कोंडले
आपली अवलाद वाढवणारी 
जिवंत यंत्र बनवले 

त्याच्या थडग्या पुढे 
कोणी नतमस्तक होत असेल 
फुले वाहत असेल
चादर चढवत असेल
सन्मान करत असेल 
जाणून बुजून 
आमच्या जखमेवर 
मीठ चोळून

तर त्या महाभागाला
मोठे म्हणणे नेता ठरवणे
त्याच्या हात हातात धरणे 
त्याच्या पंगतीत बसणे 
त्याला आदरार्थी बोलणे 
हा आमचा षंढपणा ठरेल 

आणि ते
जे चार दिवसांच्या सत्तेसाठी 
करतात लाळघोटेपणा 
त्याच्यासमोर 
झोडतात त्याच्या पार्ट्या 
करतात जयजयकार
ते  तर वारांगणाच ठरतात .

आणि मला कळत नाही 
कि ही लोक आपल्या वाचेने
महाराजांचे नाव तरी
कसे घेऊ शकतात?

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...