रविवार, १८ नोव्हेंबर, २०१२

बाळासाहेबांना माझी श्रद्धांजली २




बाळ ठाकरे नावाच तुफान
आता शांत झाले आहे
त्या निरवतेत प्रत्येक मन
आज गहिवरून आले आहे
शब्दांच्या कडकडाटात उसळणारे
भावनांच्या झंझावातात गदगदणारे
प्रत्येक लढाऊ गलबत आज
सुन्न होऊन बसले आहे
तो आवाज चिंधड्या उडवणारा
तो स्वर मित्र मिळवणारा
तो स्पष्ट घट्ट रोकठोक
टणत्कार गांडीव धनुष्याचा
आता विराम पावला आहे
हे माझ्या विद्ध मराठी मना !
तुटला जरी दोर तरीही
लढणे तुला प्राप्त आहे
चल उचल तो भगवा
तख्त दिल्लीचे, जिंकायचे आहे 

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कळत नाही

कळत नाही ******* हे आंदोलन कुणाचे आम्हाला खरंच नाही कळत यातून कुणाला फायदा मिळणार आम्हाला खरंच नाही उमजत लाखो रुपयांच्या गाड्या ...