सोमवार, २४ सप्टेंबर, २०१२

भांडी घासतांना





तू परवा परगावी गेलीस
सगळी आवर आवर करून
अर्धी अधिक जेवणाची सोय करून
आज तू परत येणार म्हणून
तुला खुश करायला
एक कविता टाकावी करून
असे ठरवून बसलो खरा पण
काही सुचेना मग उठलो अन
सगळी भांडी टाकली घासून
तशीच ठेवा म्हणून
तू गेली होतीस बजावून
पण कविते ऐवजी भांडी घासून
मला आले उमजून
तू रोज माझ्यासाठी ,या घरासाठी
कविताच लिहीत असतेस
सकाळ पासून रात्री पर्यंत
लग्नापासून आत्तापर्यंत
मी समजायचो त्याला
ते फक्त काम आहे म्हणून


विक्रांत
http://kavitesathikavita.blogspot.in/

शुक्रवार, २१ सप्टेंबर, २०१२

म्युन्सिपाल्टी ड्यूटी




एका नाईट ड्युटीला
आमच्या काही स्टाफला 
दूध संपल्या मुळे
चहा नाही मिळाला
त्यामुळे त्यांचा
संताप संताप झाला
इन्चार्ज उगाचच
शिव्यांचा धनी झाला
त्याचं रागावण साहजिक होत
कारण कुणीही त्यांची
काळजी घेत नव्हत
कुणीच अथवा
फिकीर करत नव्हत
स्टाफच्या वाटणीच दूध
दुसरीकडे वापरल गेल
देणाऱ्यांनी बिनद्दिकत दिल
घेणाऱ्यांनी बिनद्दिकत घेतलं
रात्री बोंबाबोंब होणार
त्यांना जरूर माहित होत
पण त्यावेळी आपण ड्यूटीवर नसणार
हे हि त्यांना माहित होत
म्युन्सिपाल्टीत नोकरी करतांना
अशीच न्यायची वेळ मारून
आले होते सारेजण
जणू आईच्या पोटात शिकून
किंवा मुन्सिपाल्टीच आई झाली
अन बाळांना केले तयार
काहीही न घेता अंगावर
ड्यूटीतून व्हायचे पसार
त्या क्षणी
जो तिथे हजर असतो
तोच बळीचा बकरा बनतो
वेळ काढण्यात जर वाकबगार असला
तरच वाचतो नाहीतर मरतो
कधी बसतो थोडा मार
कधी खापर सार डोक्यावर
पण त्याला नाईलाज असतो
कारण तो कुणीही असला
तरी तिथे हजर असतो
हाच त्याचा जणू गुन्हा असतो
म्हणून प्रत्येक जन इथे
वरती बाजूला बोट दाखवत
खांदे आपले असतो उडवत
नेहमी राहतो अंग चोरत .
बाजुवाल्यावर आपला
अंमल चालत नाही
वरचा कधीच काही
आपल ऐकत नाही
जू घेवून पाठीवर
ओझ वाहत रहायचं
त्याच ठराविक साच्यात
काम करीत रहायचं
अस म्हणतात की चार
पुण्यवान लोकामुळेच तर
शेषाच्या डोक्यावर
पृथ्वी अजून आहे स्थिर
तोच नियम इथे लागू आहे

स्थळ आणि काळ

याप्रमाणे फक्त
पुण्यवान बदलत आहे
नाहीतर काही खर नव्हत
मूळ मुद्दा दुधाचा
तो तर तसाच राहिला
रात्री साऱ्या स्टाफला
कोरा चहा प्यावा लागला
अन पुढच्या वेळेला
जर दूध देणारा चुकला
तर त्या रात्रपाळी इन्चार्जला
लागतील बोल ऐकायला
त्याने ते ऐकायचे
रिपोर्ट मध्ये लिहायचे
पुढच्या वेळी तरी दुधाचे
लचांड न उरावे म्हणून
गेटजवळील देवाला विनवायचे
बाहेर पडताच गेटमधून
सारे सारे विसरायचे
बस्स इतकेच हातात असते

बुधवार, १२ सप्टेंबर, २०१२

पुत्र स्वामींचे

आम्ही पुत्र स्वामींचे
अक्कलकोट वासीचे
आम्हा जन्म मृत्यूचे
भय नाही
धन्य आमुचा जन्म
झाले जन्माचे कल्याण
दृढ धरिता चरण
स्वामींचे
तुटली अवघी बंधन
संसार जाहला खेळण 
जाता स्वामींस शरण
संपूर्ण
गेली मनाची तळमळ
सरली बुद्धीची खळखळ
शांती भोगतो निखळ
स्वरूपी
सुख दाटले आत
मावता मावेना मनात
मित्रां सांगतो हि मात
म्हणोनी
मज भेटले काही
वाटे भेटो तुम्हाही
विश्व ओसंडून वाही
कृपा त्यांची

 

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in

गुरुवार, ६ सप्टेंबर, २०१२

वर्गणी


मंत्र सारे ऋचा साऱ्या
प्रार्थना या व्यर्थ आहे
वर्गणीच्या खंडणीचा 
अर्थ मात्र सार्थ आहे

साऱ्यांचे हिशोब त्यांच्या
दफ्तरात दर्ज आहे
माफीसाठी केले अर्ज 
खारीज ते सर्व आहे

घेवून फुले धूपदीप
देव आत गप्प आहे
ताटातील चील्लरीत 
नि कुणाचे लक्ष्य आहे 

खर्चाचा हिशोब त्यांना
कोण  विचारणार आहे
जाती पिढया उद्धरून
ऐसे पुण्य द्वाड आहे

 डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे

अटळ

अटळ **** गिरनारी मूर्ती फुटली गोरक्षाची  ती कृती भ्याड नामर्द रात्रीची  अफगाणी मूर्ती फुटली गौतमाची  ती कृती उद्दाम  द्वाड दिवसा...