शुक्रवार, २५ फेब्रुवारी, २०२२

मित्र भेटी

मित्र भेटी
********

कारण काही नसते 
तरी भटकत येतो
उगाचच काही गप्पा 
नि गोष्टी करून जातो

मित्रांना भेटायला का 
कारण काही लागते 
जीवलग दिसायला 
गरज कसली असते

खरतर नात्यातले
इथे कोणीच नसते 
देणे घेणे व्यवहारी
काही काहीच नसते

सुख दुःख तयासवे
काही वाटली जातात
मनातील भार काही
सल निघून जातात

ते ऋण त्यांचे हवेसे
कधी फिटत नसते
दिवसोंदिवस मनी
सदा वाढावे वाटते 


🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझी नर्मदा परिक्रमा

माझी  नर्मदा परिक्रमा  ***************** दिनांक 8 फेब्रुवारी 26 ते 27 जून 26 अशी 140 दिवसांची  परिक्रमा नर्मदा मैयेने पूर्ण करून...