जेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)
शुक्रवार, १९ एप्रिल, २०१३
गुरुवार, १८ एप्रिल, २०१३
सांग देवा कधी
सांग देवा कधी l पिकेल हे फळ l
गळून पडेल l मातीवरी ll १ ll
सांग देवा कधी l उजाडेल दिन l
हरेल अज्ञान l तमोमय ll २ ll
सांग देवा कधी l तुझा मी होईल l
जळून जाईल l देहभाव ll ३ ll
संग देवा कधी l बेचैनी सरेन l
शांतीने भरून l जाईल मी ll ४ ll
विक्रांत प्रभाकर
http://vikrantchishodhyatra.blogspot.in/
मंगळवार, १६ एप्रिल, २०१३
लग्न करणाऱ्या मित्रास ,
लग्न करणाऱ्या मित्रास ,
लग्न करून माणसं सुखी
होतात की नाही
हे मला अजूनही नीट
कळलेले नाही
तरीसुद्धा तुझे वैवाहिक जीवन
सुखी होवो
ही शुभेच्छा दयायला
काहीच हरकत नाही
परीक्षेत हमखास नापास होणा-या
विद्यार्थांस ही आपण आँल द बेस्ट
देतोच की नाही
पण खर सांगु मित्रा
मला मनापासून वाटत
दुनिया पाहिल्यावर स्पष्ट दिसत
आपल्या जीवनसाथीदाराला जे
बायको करून टाकतात
ते आपल्या जीवनात
सायको होऊन जातात
तिच्या त्याच्या व्यवहारात
कायदेकानू तयार होतात
प्रेमपंख सारे मग गळून पडतात
तिने असेच वागले पाहिजे
असेच त्याला वाटते
तिचेही काहीसे तसेच असते
कधी कधी कुणी
आपले मन मारून टाकते
आहे तसे त्यात जुळत घेत राहते
कुणा कुणाच कधी
पार फाटत फाटत जाते
पण मिळत जुळत घेणे
वा काडीमोड करणे
यात जीवन हरवून जाते
नाही म्हणजे लग्न झाल्यावर
बरच काही बदलत असते
नवे जग, नवे व्यवहार
हे सारे अपेक्षित असते
नव्या बागेत रोपही
कसे वेगळे वाढू लागते
वेगळी वळण नव्या फांद्या
नवे रूप फुलू लागते
परंतु माझ म्हणण वेगळे आहे
जीवनाच्या गाभ्याशीच
त्याचे खोल नाते आहे
सहजीवनाच सूत्र त्यात
निखळ प्रेम व्यक्त आहे
प्रेम प्रीती शब्द फार वरवरचे आहेत
अनर्थाचे त्यावरती बरेच छाप आहेत
हक्क अहंकार अपेक्षा नसते
तेव्हा जी कृती घडते
नात्यात व संबंधात उतरते
तेव्हाच प्रीती घडत असते
तेच जीवन जगणे असते
अशीच प्रीती तुमच्यात घडो
बंधन नको बंध जडो
मैत्री व प्रीती उलगडो
हि शुभेच्छा आता देतो
थोडे कळले जे ते सांगतो
विक्रांत
प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
विक्रांत
प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
गुरुवार, ११ एप्रिल, २०१३
काळू कुत्रा
काळू कुत्रा
गल्ली मधला
गल्ली सोडून
कधी न गेला
अन आमच्या
जीवनातील
एक अविभाज्य
भाग झाला
उगाच भुंके
याला त्याला
नच धाडस पण
चावण्याला
अन माने मालक
आपुला
गल्ली मधल्या
प्रत्येकाला
ऐट मिरवे कावळे
हाकलीत
मरतुकड्यावर
फुकाच धावत
नंतर येवून उभा
राहतो
मोठा पराक्रम
केल्यागत
भरदुपारी गेट
समोर
ताणून देई
उन्हात शेकत
आल्या गेल्या
कुणा न पाही
मुन्सिपालटी पहारेकरयागत
विक्रांत
प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)
वृक्ष वंश उच्छेद
वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते तोडताच झाड मन कळवळते एकेक झाडात लक्षावधी जीव राहतात प्रेमाने करुनिया गाव ...
-
वृक्ष शोक ******** प्रत्येक झाड वाचलं पाहिजे . जंगलापासून गावापर्यंत . गावापासून गल्लीपर्यंत गल्लीपासून कुंडीपर्यंत . प्रत्येका...
-
आळंदी निवासी ************ आळंदी निवासी तुम्ही भक्त थोर संतांचे माहेर झाला असे ॥१ काय वाणू तुम्हा जन भाग्यशाली जणू निवडली रत्ने...
-
झाकलिया घटीचा दिवा । नेणिजे काय झाला केधवा । यारीती जो पांडवा । देह ठेवी ...ज्ञानेश्वरी मरण ***** असे हवे रे सुंदर मरण ज्यात ओघळून जाईल ज...
-
महातेजा ******** माझ्या जीवलगा प्रिय ज्ञानराया येऊ दे रे दया तुज माझी ॥१ देई गा भरून फाटकी ही झोळी प्रकाशाचा भाळी टिळा लावी ॥२ ...
-
वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते तोडताच झाड मन कळवळते एकेक झाडात लक्षावधी जीव राहतात प्रेमाने करुनिया गाव ...
-
झाडे मरतात ********** असे कसे हे रे असे कसे जिकडे तिकडे भरतात खिसे . तोडता भरती खिसे लावता भरती खिसे खिशात पैशाचे जणू की झाड असे...
-
दारी आलो ******* केली खटपट आणि दारी आलो तुजला भेटलो कृपा तुझी जरी अट्टाहास देवा माझा वेडा अदृश्याचा खोडा होता मागे किती अडकल...
-
कृष्णजी कधीतरी येतात अन मला आत खूप खोलवर घेवून जातात . ते आत जाण असते मोठे विलक्षण ते मुद्दाम जाणून बुजून मुळी न येते...
-
समजाविता कुणास मीच भारावून गेलो कळेना कसा मजला मीच हरवून आलो ठाव नसे काही पण नवीन होवून आलो नाव गाव सांडूनिया जग...
-
।। दत्त तारीतो ।। ********** दत्त वारीतो दु:खा ला दत्त आणि तो सुखाला दत्त अंतरी भरला सदा तारी तो मजला || . दत्त आवरे मना...


