मंगळवार, १ ऑक्टोबर, २०१३

मोडू म्हणूनिया कधी



मोडू म्हणूनिया कधी
नाते नच मोडते रे
सोडू म्हणुनिया कधी
प्रेम नच तुटते रे

सुख दु:खी बांधलेल्या
गाठी जन्मा सवे येती
नाही म्हणूनि का कधी
अव्हेरती बीजा माती

लक्ष लक्ष योजने ती
पक्षी दिगंतरा जाती
साद घालताच कुणी
पुन्हा परतुनी येती

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

दिगंबर आजबे

स्व . दिगंबर आजबे *********** दिगंबर उर्फ डिगा आजबे जामखेड मधील सातवी आठवीच्या वर्गात माझ्याबरोबर शिकत होता . दत्ता आणि डिगा सख्...