गुरुवार, ७ फेब्रुवारी, २०१३

ती भेटली की




ती भेटली की
मज कविता सुचते
अजूनही माझ्या साठी
ती कविताच असते.
आपण कविता लिहितो
असे आपणास वाटते
पण ती कविता
आपली कधीच नसते.
ते तर तिचेच
अमूर्त प्रेम असते
कणाकणातून आपल्या
हळूच रुजून येते .
त्या प्रेमाला आता
काही मागायचे नसते
कुणाकडून काही
मिळवायचे नसते 

विक्रांत प्रभाकर 


 

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

दिगंबर आजबे

स्व . दिगंबर आजबे *********** दिगंबर उर्फ डिगा आजबे जामखेड मधील सातवी आठवीच्या वर्गात माझ्याबरोबर शिकत होता . दत्ता आणि डिगा सख्...